टीम मटा
जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात बुधवारी (दि. ११) पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात दुपारी अचानक काळोख दाटून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पुन्हा ऊन पडले होते. मंगळवारी, रात्री व बुधवारी काहीवेळ झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रावेरला वीज पडून एक तरुण ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.
जळगाव शहरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला होता. रात्री नऊ वाजेच्या सुमारास काहीवेळ विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री पावसाने जळगाव चिंब केले. बुधवारी, सकाळी लख्ख ऊन होते मात्र त्यानंतर दुपारी पुन्हा अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन तासभर पावसाच्या सरी आल्या.
जामनेर तालुक्यात पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून जामनेर तालुक्यात होत असलेल्या परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि. ११) दुपारी एक वाजेपासून तालुक्यात सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी दिली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा अगोदरच संकटात सापडलेला असताना काही प्रमाणात कापसाचे पिक हाती येईल या आशेवर असताना; वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे शेती खरीप हंगाम धोक्यात आला असून, कापसावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. ज्वारी, बाजरी व मका या पिकांना पावसाने मार बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसाने नद्यांच्या व धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शेती नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीज पडून तरुण ठार
रावेर : तालुक्यातील कुंभारखेडा ते उटखेडा दरम्यान सुकीनदीत मेंढ्या चारत असताना बुधवारी (दि. ११) मेंढपाळ तरुणांवर वीज कोसळली. यात एकाचा मृत्यू ओढवला तर एक जखमी झाला आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुंभारखेडा व उटखेडादरम्यान असलेल्या सुकी नदीपात्रात कृष्णा अप्पा कोळपे (वय १७) व त्याचा सोबती हे दोघे मेंढ्या चारत असताना वीज कोसळली. यात कृष्णा कोळपे याचा जागीच मृत्यू झाला तर सखाराम कोळपे हा जखमी झाला आहे. डॉ. अजित थोरबले, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी जखमीस तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात बुधवारी (दि. ११) पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात दुपारी अचानक काळोख दाटून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पुन्हा ऊन पडले होते. मंगळवारी, रात्री व बुधवारी काहीवेळ झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रावेरला वीज पडून एक तरुण ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.
जळगाव शहरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला होता. रात्री नऊ वाजेच्या सुमारास काहीवेळ विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री पावसाने जळगाव चिंब केले. बुधवारी, सकाळी लख्ख ऊन होते मात्र त्यानंतर दुपारी पुन्हा अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन तासभर पावसाच्या सरी आल्या.
जामनेर तालुक्यात पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून जामनेर तालुक्यात होत असलेल्या परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि. ११) दुपारी एक वाजेपासून तालुक्यात सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी दिली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा अगोदरच संकटात सापडलेला असताना काही प्रमाणात कापसाचे पिक हाती येईल या आशेवर असताना; वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे शेती खरीप हंगाम धोक्यात आला असून, कापसावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. ज्वारी, बाजरी व मका या पिकांना पावसाने मार बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसाने नद्यांच्या व धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शेती नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीज पडून तरुण ठार
रावेर : तालुक्यातील कुंभारखेडा ते उटखेडा दरम्यान सुकीनदीत मेंढ्या चारत असताना बुधवारी (दि. ११) मेंढपाळ तरुणांवर वीज कोसळली. यात एकाचा मृत्यू ओढवला तर एक जखमी झाला आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुंभारखेडा व उटखेडादरम्यान असलेल्या सुकी नदीपात्रात कृष्णा अप्पा कोळपे (वय १७) व त्याचा सोबती हे दोघे मेंढ्या चारत असताना वीज कोसळली. यात कृष्णा कोळपे याचा जागीच मृत्यू झाला तर सखाराम कोळपे हा जखमी झाला आहे. डॉ. अजित थोरबले, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी जखमीस तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.