म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
शेतकऱ्यांसंबंधित विविध मागण्यासाठी तालुक्यातील देवळी येथे किसान क्रांती मोर्चा शेतकरी सुकाणू समितीकडून रास्ता रोको करण्यात आले. सकाळी १० वाजता करण्यात आलेल्या या आंदोलनात रयत सेनेसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. शेतकऱ्यांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक दीड तास रोखून धरली होती.
'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', 'शेतकरी एकजुटीचा विजय असो', अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. देवळी, पिलखोड, पिंपळवाड, चिंचखेडे, दडपिंप्री, डोण, आडगाव, ब्राह्मणशेवगे, पाटणा या परिसरातील शेतकरी उपस्थित होते. आंदोलनात विवेक रणदिवे, गणेश पवार, सुधीर पवार, ज्ञानेश्वर कोल्हे, दिलीप घोरपडे, अतुल गायकवाड आदींनी सहभाग घेतला.
शेतकऱ्यांची थट्टा
शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असून, अशी कर्जमाफी नको. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर पुन्हा उतरावे लागत आहे, असेही शेतकरी म्हणाले. या मागण्या सरकारने ताबडतोब मान्य कराव्या. नाही तर शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असून, सरकारची मस्ती जिरवण्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांसंबंधित विविध मागण्यासाठी तालुक्यातील देवळी येथे किसान क्रांती मोर्चा शेतकरी सुकाणू समितीकडून रास्ता रोको करण्यात आले. सकाळी १० वाजता करण्यात आलेल्या या आंदोलनात रयत सेनेसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. शेतकऱ्यांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक दीड तास रोखून धरली होती.
'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', 'शेतकरी एकजुटीचा विजय असो', अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. देवळी, पिलखोड, पिंपळवाड, चिंचखेडे, दडपिंप्री, डोण, आडगाव, ब्राह्मणशेवगे, पाटणा या परिसरातील शेतकरी उपस्थित होते. आंदोलनात विवेक रणदिवे, गणेश पवार, सुधीर पवार, ज्ञानेश्वर कोल्हे, दिलीप घोरपडे, अतुल गायकवाड आदींनी सहभाग घेतला.
शेतकऱ्यांची थट्टा
शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असून, अशी कर्जमाफी नको. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर पुन्हा उतरावे लागत आहे, असेही शेतकरी म्हणाले. या मागण्या सरकारने ताबडतोब मान्य कराव्या. नाही तर शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असून, सरकारची मस्ती जिरवण्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. पाटील यांनी केले.