अ‍ॅपशहर

साठवण बंधाऱ्यावर दरवाजे बसवावेत

रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे दोन साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मंदिराच्या पश्चिमेस असलेल्या बंधाऱ्याला निकृष्ट दरवाजे बसविलेले असल्याने त्यातून पाणी वाहून जाते अथवा कुणीही दरवाजे उघडून देतो. हे पाणी वाहून जात असल्यामुळे शेतकऱ्यांकडून चांगले दरवाजे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 4:00 am
रावेर : रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे दोन साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मंदिराच्या पश्चिमेस असलेल्या बंधाऱ्याला निकृष्ट दरवाजे बसविलेले असल्याने त्यातून पाणी वाहून जाते अथवा कुणीही दरवाजे उघडून देतो. हे पाणी वाहून जात असल्यामुळे शेतकऱ्यांकडून चांगले दरवाजे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raver news
साठवण बंधाऱ्यावर दरवाजे बसवावेत


तामसवाडी व बोरखेडा ही गृप ग्रामपंचायत असून, तामसवाडी गावाजवळ भोकर नदीवर साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. साठवण बंधारे तामसवाडी ग्रामपंचायत शिवारात येत असल्याने सदरहू बंधारे हे ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात येणे गरजेचे होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या ताब्यात हे बंधारे नसून, त्यातील एक बंधारा मोठ्या स्वरूपाचा आहे. त्याला दरवाजेही बसविण्यात आले आहेत मात्र ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने पूर्ण पाणी वाहून जात आहे. पाणी अडवून जिरणे गरजेचे असून त्यासाठीच शासनातर्फे बंधारे बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च केले असताना पाणी थांबत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. बंधाऱ्याच्या बाजूच्या शेती शिवारात पाणी थांबल्यावर जलपातळीत वाढ होत असे. मात्र बंधाऱ्याची दारे नसल्याने पाणी थांबत नाही. भविष्यात या गावाला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज