म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
महामार्गावर पाचशे मिटर अंतराच्या आत दारूबंदीच्या न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील तालुक्यात व शहरात अवैध व बनावट देशी विदेशी दारू सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबत चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करूनदेखील अवैध दारूविक्री बंद होत नसल्याने अवैध दारूविक्री पंधरा दिवसांच्या आत बंद न झाल्यास रयत सेनेच्या वतीने मुंबई येथे मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत दारूबंदी निरीक्षक यांच्याद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकारी यांनी सोमवारी (दि. ३) राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे उपायुक्त, जळगाव विभागाचे अधीक्षक यांना हेनिवेदन दिले. या निवेदनात, न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून महामार्गालगत व शहरात काही ठिकाणी दारूबंदीचे आदेश आहेत, असे असताना चाळीसगाव शहर व तालुक्यात देशी, विदेशी, गावठी व बनावट दारू सर्रासपणे विक्री होत आहे, असे म्हटले आहे. याविरोधात रयत सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चाळीसगाव निरीक्षक यांना वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलनदेखील करण्यात आले. तरीदेखील अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
शुल्क विभागाकडून कारवाई केव्हा?
चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने अवैध दारू विरोधात मोहीम सुरू असून, त्यांनी कारवाया केल्या आहेत. मागील महिन्यात अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने भडगाव रोड येथे दारूने भरलेला ट्रक पकडला होता. त्याचप्रमाणे चाळीसगाव-औरंगाबाद (बायपास) महामार्गावर दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारून देशी-विदेशी दारूसह बनावट दारू तयार करण्याचे साहित्य ताब्यात घेऊन कार्यवाही केली होती. पोलिसांकडून कारवाई होत असताना दारूबंदी विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही, असा प्रश्न यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयाबद्दल जनतेत संभ्रम निर्माण झाला असून, आपल्या स्तरावरून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी या निवदेनाद्वारे राज्य उत्पादन शुल्काच्या चाळीसगाव कार्यालयाला करण्यात आली आहे. संबंधित अवैध दारू विक्रेत्याविरोधात कारवाई न झाल्यास रयत सेनेच्या वतीने मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गणेश पवार, सूर्यकांत कदम, संजय कापसे, ज्ञानेश्वर कोल्हे, अनिल कोल्हे, स्वप्निल गायकवाड, पंकज पाटील, शहराध्यक्ष मयूर चौधरी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत.
महामार्गावर पाचशे मिटर अंतराच्या आत दारूबंदीच्या न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील तालुक्यात व शहरात अवैध व बनावट देशी विदेशी दारू सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबत चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करूनदेखील अवैध दारूविक्री बंद होत नसल्याने अवैध दारूविक्री पंधरा दिवसांच्या आत बंद न झाल्यास रयत सेनेच्या वतीने मुंबई येथे मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत दारूबंदी निरीक्षक यांच्याद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकारी यांनी सोमवारी (दि. ३) राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे उपायुक्त, जळगाव विभागाचे अधीक्षक यांना हेनिवेदन दिले. या निवेदनात, न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून महामार्गालगत व शहरात काही ठिकाणी दारूबंदीचे आदेश आहेत, असे असताना चाळीसगाव शहर व तालुक्यात देशी, विदेशी, गावठी व बनावट दारू सर्रासपणे विक्री होत आहे, असे म्हटले आहे. याविरोधात रयत सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चाळीसगाव निरीक्षक यांना वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलनदेखील करण्यात आले. तरीदेखील अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
शुल्क विभागाकडून कारवाई केव्हा?
चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने अवैध दारू विरोधात मोहीम सुरू असून, त्यांनी कारवाया केल्या आहेत. मागील महिन्यात अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने भडगाव रोड येथे दारूने भरलेला ट्रक पकडला होता. त्याचप्रमाणे चाळीसगाव-औरंगाबाद (बायपास) महामार्गावर दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारून देशी-विदेशी दारूसह बनावट दारू तयार करण्याचे साहित्य ताब्यात घेऊन कार्यवाही केली होती. पोलिसांकडून कारवाई होत असताना दारूबंदी विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही, असा प्रश्न यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयाबद्दल जनतेत संभ्रम निर्माण झाला असून, आपल्या स्तरावरून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी या निवदेनाद्वारे राज्य उत्पादन शुल्काच्या चाळीसगाव कार्यालयाला करण्यात आली आहे. संबंधित अवैध दारू विक्रेत्याविरोधात कारवाई न झाल्यास रयत सेनेच्या वतीने मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गणेश पवार, सूर्यकांत कदम, संजय कापसे, ज्ञानेश्वर कोल्हे, अनिल कोल्हे, स्वप्निल गायकवाड, पंकज पाटील, शहराध्यक्ष मयूर चौधरी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत.