अ‍ॅपशहर

महापालिकेत अॅप्रेंटिस तत्त्वावर भरती

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत अपुऱ्या मनुष्यबळाअभावी प्रशासनाची काम करताना तारांबळ होत आहे. त्यामुळे रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा विचार सुरू होता. आता पालिका प्रशासन रिक्त जागांवर अॅप्रेंटिस तत्त्वावर व्यवसायप्रशिक्षित उमेदवारांची भरती करणार आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे ४०० पदे भरता येणार आहेत. विशेष म्हणजे, या उमेदवारांच्या पगाराचा २० टक्के हिस्सा सरकार भरणार आहे.

Maharashtra Times 22 May 2019, 5:00 am
चारशे पदे भरण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांवरील भार कमी होणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम recruitment on apprentice principle in jalgoan municipal corporation
महापालिकेत अॅप्रेंटिस तत्त्वावर भरती


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत अपुऱ्या मनुष्यबळाअभावी प्रशासनाची काम करताना तारांबळ होत आहे. त्यामुळे रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा विचार सुरू होता. आता पालिका प्रशासन रिक्त जागांवर अॅप्रेंटिस तत्त्वावर व्यवसायप्रशिक्षित उमेदवारांची भरती करणार आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे ४०० पदे भरता येणार आहेत. विशेष म्हणजे, या उमेदवारांच्या पगाराचा २० टक्के हिस्सा सरकार भरणार आहे.

सन २००३ मध्ये जळगाव नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा मिळाला. त्यानंतर क्षेत्र व कार्यभार वाढला, प्रशासकीय कामकाजातदेखील काही महत्त्वाचे बदल झाले. महापालिका झाल्यानंतर आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचा विभागनिहाय आकृतीबंधातदेखील बदल करणे आवश्यक होते. महापालिका झाल्यानंतरही नगरपालिकेच्या मंजूर पदावरच्या कामकाजास सुरुवात झाली. त्यामुळे आकृतीबंधाशिवायच गेल्या अकरा वर्षांपासून महापालिकेचे कामकाज सुरू आहे.

दरवर्षी अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मनुष्यबळ कमी होत आहे. महापालिकेत अप्पर आयुक्तपद, एक उपायुक्त, तीन सहाय्यक उपायुक्त, मुख्य लेखाअधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, आरोग्य अधिकारी, वाहन विभागप्रमुख अशा अधिकाऱ्यांसह तांत्रिक कमचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदभार देऊन प्रभारी कारभारी करून काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र सध्या सुरू आहे. यामुळे प्रशासनाला काम करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी आता सरकारच्या तरतुदीचा फायदा घेत महापालिका रिक्त पदे अप्रेंटिस तत्त्वावर भरणार आहे. महापालिकेच्या मंजूर मनुष्यबळाच्या तुलनेत या पदांची संख्या राहणार असून, त्यानुसार महापालिकेला ३६० ते ४२० पदे भरता येणे शक्य आहे.

रिक्तपदांची माहिती मागविली
महापालिका प्रशासनाने सव विभागांकडून रिक्त असलेल्या व आवश्यक पदांची माहिती मागवून घेतली आहे. त्यानुसार पदे भरली जाणार आहे. किती पदे भरायची हे निश्चित झाल्यानंतर त्या पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यात येणार आहे. शासनाने मान्यता दिल्यावर त्या पदांसाठी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात येऊन परीक्षा व मुलाखती घेऊन ही पदे भरली जाणार आहेत. ही पदे भरल्यानंतर त्यांना ४ हजार ते ८ हजार रुपये महिना यादरम्यान पदानुसार मानधन दिले जाणार आहे.

तांत्रिक पदांसह अभियंतेही मिळणार
ही भरती करताना यात आयटीआय, अभियांत्रिकी, मार्केटिंग, संगणक अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांतील पदव्या घेतलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. त्यात अभियंता, कम्प्युटर ऑपरेटर, प्लम्बर, क्लोरिन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, वाहन विभागासाठी तांत्रिक कर्मचारी महापालिकेला मिळणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज