अ‍ॅपशहर

अवैध धंद्यांविरोधात संभाजी ब्रिगेडचे निवेदन

तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये सर्रास सुरू असलेले अवैध धंदे व वाळूतस्करी बंद करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Maharashtra Times 4 Sep 2017, 4:00 am
रावेर : तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये सर्रास सुरू असलेले अवैध धंदे व वाळूतस्करी बंद करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sambhaji brigades appeal against illegal activities at raver
अवैध धंद्यांविरोधात संभाजी ब्रिगेडचे निवेदन


तालुक्यातील पूर्व भागातील चोरवड, अजनाड, दोधे परिसरातून राजकीय वरदहस्त असलेल्या काही व्यक्ती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मध्य प्रदेशात वाळूतस्करी करतात. शासकीय अधिकाऱ्यांच्या साटेलोटामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. मौजे खानापूर, कर्जोद, चोरवड, वाघोड, अटवाडे, अजनाड, दोधे गावात अवैध दारू विक्री खुल्या परिसरात होत असून, सट्टा व जुगार अड्डयांनी हैदोस घातलेला असल्याचेही यात नमूद केले आहे. या सर्व अवैध धंद्यांमुळे ऐन गणेशोत्सवात गावातील शांतता भंग पावत आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या आठ दिवसांत मार्गी लावा, असे यात म्हटले आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेड व पीडित महिलांमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. प्रसंगी तालुकाध्यक्ष विलास ताठे, किशोर पाटील, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी, राजेश महाजन, विनोद चौधरी, संजय महाजन, भूषण पाटील आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज