म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
महाराष्ट्र सरकारच्या ई-फेरफार कार्यक्रमाअंतर्गत दि. १ ऑगस्टपासून सर्व सातबारा उतारे तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी खातेदारांना त्यांचा सातबारा पडताळणीसाठी व त्यात दुरुस्ती असल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचनासाठी दिनांक १६ ते २१ मेदरम्यान ७ मंडळ स्तरावरील ६१ गावांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित करण्यात आले असून, त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या संबंधित सजेवर उपस्थित राहून चावडी वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
तालुक्यातील एकूण १३६ गावांपैकी ६१ गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामकाज ९८ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये चावडी वाचनाचे नियोजन असून, उर्वरित गावांचे संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
चावडी वाचनाच्या नियोजित कार्यक्रमात दि. १६ ते १९ दरम्यान मेहुणबारे मंडळातील १३ गावे, दि. १६ ते २१ दरम्यान तळेगाव मंडळातील ९ गावे तर दि. १६ ते २२ या कालावधीत खडकी मंडळातील १७ गावे असे पहिल्या टप्प्यातील ६१ गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
८५.५ टक्के ऑनलाइन
चाळीसगाव तालुक्यातील १३६ गावांमधील एकूण सातबाऱ्यांची संख्या ही १ लाख ३७ हजार ८१ इतकी आहे. आजतागायत १ लाख १७ हजार १४६ इतक्या सातबाऱ्यांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ८५.५ टक्के इतकी आहे. एकूण १३६ पैकी ६१ गावांचे संगणकीकरणाचे कामकाज ९८ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यात ६१ गावांची निवड चावडी वाचनासाठी करण्यात आली आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. संगणकीकरणाच्या कामाचा आवाका अधिक असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःशी संबंधित सातबारा वेबसाईटवरून डाऊनलोड करून अथवा तलाठी यांच्याकडील अभिलेख पाहण्यासाठी चावडी वाचनात सहभाग घ्यावा. त्यामध्ये आपापल्या सातबाऱ्यांवर चुका असल्यास योग्य त्या पुराव्यासह दुरुस्ती असल्यास तसा अर्ज करून दुरुस्ती करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही तहसीलदार देवरे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ई-फेरफार कार्यक्रमाअंतर्गत दि. १ ऑगस्टपासून सर्व सातबारा उतारे तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी खातेदारांना त्यांचा सातबारा पडताळणीसाठी व त्यात दुरुस्ती असल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचनासाठी दिनांक १६ ते २१ मेदरम्यान ७ मंडळ स्तरावरील ६१ गावांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित करण्यात आले असून, त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या संबंधित सजेवर उपस्थित राहून चावडी वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
तालुक्यातील एकूण १३६ गावांपैकी ६१ गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामकाज ९८ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये चावडी वाचनाचे नियोजन असून, उर्वरित गावांचे संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
चावडी वाचनाच्या नियोजित कार्यक्रमात दि. १६ ते १९ दरम्यान मेहुणबारे मंडळातील १३ गावे, दि. १६ ते २१ दरम्यान तळेगाव मंडळातील ९ गावे तर दि. १६ ते २२ या कालावधीत खडकी मंडळातील १७ गावे असे पहिल्या टप्प्यातील ६१ गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
८५.५ टक्के ऑनलाइन
चाळीसगाव तालुक्यातील १३६ गावांमधील एकूण सातबाऱ्यांची संख्या ही १ लाख ३७ हजार ८१ इतकी आहे. आजतागायत १ लाख १७ हजार १४६ इतक्या सातबाऱ्यांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ८५.५ टक्के इतकी आहे. एकूण १३६ पैकी ६१ गावांचे संगणकीकरणाचे कामकाज ९८ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यात ६१ गावांची निवड चावडी वाचनासाठी करण्यात आली आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. संगणकीकरणाच्या कामाचा आवाका अधिक असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःशी संबंधित सातबारा वेबसाईटवरून डाऊनलोड करून अथवा तलाठी यांच्याकडील अभिलेख पाहण्यासाठी चावडी वाचनात सहभाग घ्यावा. त्यामध्ये आपापल्या सातबाऱ्यांवर चुका असल्यास योग्य त्या पुराव्यासह दुरुस्ती असल्यास तसा अर्ज करून दुरुस्ती करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही तहसीलदार देवरे यांनी कळविले आहे.