अ‍ॅपशहर

गद्दारांचा स्पर्श नको..., गुलाबराव पाटील जाताच शिवसैनिक आक्रमक; पुतळ्यांचे शुद्धीकरण

Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांविरोधात शिवसैनिकांमध्ये अजूनही रोष आहे. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील यांनी महारापुरुषांच्या पुतळ्याचे अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांनी सर्व पुतळ्यांचे शुद्धीकरण केले. यामुळे जिल्ह्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2022, 2:28 pm
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील हे गद्दार आहेत. अशा गद्दारांचा महापुरुषांच्या पुतळ्यास स्पर्श झाला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे समर्थकांनी गुलाबराव पाटील यांनी अभिवादन करत स्पर्श केलेल्या धरणगावातील पुतळ्यांचे दुग्ध अभिषेक करत शुद्धीकरण केले. यावरून आता शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे समर्थक पुन्हा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon shiv sena
गद्दारांचा स्पर्श नको..., गुलाबराव पाटील जाताच शिवसैनिक आक्रमक; पुतळ्यांचे शुद्धीकरण


मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे शनिवारी प्रथमच जळगावमध्ये आले. आपल्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले होते.

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले सगळे गद्दार आहेत, असे म्हणत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात ठाकरे समर्थक शिवसैनिक आक्रमक झाले. गुलाबराव पाटील यांनी ज्या ज्या पुतळ्यांना स्पर्श करत अभिवादन केले होते, त्यांचे शुद्धीकरण केले. गुलाबराव पाटलांविरोधात धरणगावमध्ये शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी दुग्धाभिषेक करून महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केले. गुलाबराव पाटलांनी स्पर्श केलेल्या त्या सर्व पुतळ्यांवर दुग्धाभिषेक करत त्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केले. रविवारी आज धरणगावात हे अनोखं आंदोलन करण्यात आल्याने जिल्ह्यातील वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

कोण होणार नाशिक, जळगावचे पालकमंत्री? खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच महाजनांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा आरोप ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी केला आहे.

माझं कुणी काही वाकडं करु शकत नाही, तिसरा डोळा उघडला तर... : गुलाबराव पाटील

करोनाच्या काळात चांगलं काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंचं जगाने आणि सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. अशा माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून ४० जणांनी गद्दारी केली. ते आधीही मंत्री होते आणि आताही आहेत. मग गद्दीरी करून असं काय मिळवलं? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं. पण गेल्या महिन्यापासून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली होत आहे. हे सर्व जनता पाहत आहे. आणि छत्रपती शिवरायांनी निष्ठावात मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभं केलं. पण या गद्दारांनी आपली निष्ठा विकली. यामुळे शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असं शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले.

महत्वाचे लेख