अ‍ॅपशहर

..तर शिवसेनास्टाइल आंदोलन

महावितरणच्या कार्यालयात नागरिक समस्या घेऊन गेल्यास अधिकारी तक्रार ऐकून घेत नाहीत.

Maharashtra Times 16 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena will take action
..तर शिवसेनास्टाइल आंदोलन


महावितरणच्या कार्यालयात नागरिक समस्या घेऊन गेल्यास अधिकारी तक्रार ऐकून घेत नाहीत. तसेच लोकप्रतिन‌िधी व ग्रामसेवकांचे फोनदेखील घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यात सुधारणा न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांचा शिवसेना स्टाइलने समाचार घेतला जाईल, असा सज्जड इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.

अजिंठा विश्रामगृहात महावितरणची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, एन. डी. नारायणे, एस. के. पाटील, कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्यासह सर्व तालुक्यांतील अभियंत्यांसह सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

बैठकीला सुरुवात होताच सरपंच व ग्रामसेवकांनी सांग‌ितले की, लोडशेड‌िंग करताना शहर व ग्रामीण असा भेदभाव केला जातो. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेल्यास आमचे नाव बदनाम करीत असल्याच्या तक्रारी त्यांनी मांडल्या. तसेच गावांमध्ये पुरेशी वीज पोहचत नसल्याने पाणीपुरवठादेखील पुरेसा होत नसल्याची तक्रार ग्रामसेवकांनी बैठकीत मांडली. यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांविषयी चांगलेचा धारेवर धरुन त्यांची कानउघडणी केली. तक्रारींचा लवकर निपटारा करण्याचे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

माहितीअभावी निधी पडून

योजनांसाठी शासनाकडून मिळणारा निधीदेखील खर्च होत नसल्याने हा निधी वर्षानुवर्षे पडून पुन्हा शासनाकडे वर्ग होत असल्याची कबुली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण भागांमध्ये इंजिनीअर नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी ग्रामसेवकांनी बैठकीत मांडल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज