अ‍ॅपशहर

कार्यशाळेतून सापडल्या संशोधनाच्या वाटा

विज्ञानाची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि भविष्यातील संशोधनाच्या वाटा शोधण्यास कार्यशाळेचा भरपूर फायदा झाला आहे. यातूनच आम्हा विद्यार्थ्यांमधून खान्देशात चांगले संशोधक निर्माण होतील, असा विश्वास संशोधन वृद्धी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरूंच्या उपस्थितीत या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले.

Maharashtra Times 12 Jun 2018, 5:00 am
‘संशोधनवृद्धी’ कार्यशाळा समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांचा विश्वास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students workshop on research at north maharashtra university jalgaon
कार्यशाळेतून सापडल्या संशोधनाच्या वाटा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

विज्ञानाची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि भविष्यातील संशोधनाच्या वाटा शोधण्यास कार्यशाळेचा भरपूर फायदा झाला आहे. यातूनच आम्हा विद्यार्थ्यांमधून खान्देशात चांगले संशोधक निर्माण होतील, असा विश्वास संशोधन वृद्धी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरूंच्या उपस्थितीत या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी १ ते १० जून, २०१८ या दरम्यान संशोधन वृद्धी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळा (समर वर्कशॉप) आयोजित केली होती. या कार्यशाळेचे हे दुसरे वर्ष होते. रविवारी (दि. १०) उद्योजक छबीराज राणे व व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील होते.

दहा दिवसांच्या या कार्यशाळेविषयी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी करून विज्ञानाविषयी आस्था निर्माण केली. देशभरातील नामवंत तज्ज्ञांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन केले. त्याचा फायदा आत्मविश्वास वाढण्यात झाला. भविष्यात विज्ञानाचे संशोधन सुरू राहिल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. राणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्याविषयीच्या टिप्स दिल्या.

या विद्यार्थिभिमूख उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून अशा उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद केली जावी, अशी अपेक्षा दिलीप पाटील यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. पाटील यांनी या कार्यशाळेला दरवर्षी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि अशा कार्यशाळांमधूनच उद्याचे संशोधक निर्माण होणार आहेत, असे मत व्यक्त केले. प्रा. एस. टी. बेंद्रे यांनी प्रारंभी या कार्यशाळेचा आढावा घेतला. समन्वयक प्रा. एच. एल. तिडके यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रद्धा परदेशी आणि कुणाल मानकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. रत्नमाला बेंद्रे यांनी आभार मानले. सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज