कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
भारत सर्वात जास्त तरुणांचा देश असल्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन करत असताना जिद्द, चिकाटी, मेहनत करून ध्येय ठरवा अन् वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी केले. ते सरदार वल्लभ्ाभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था व युवा विकास फाउंडेशनने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. प्रत्येकाचे यशाचे पैलू वेगवेगळे असतात. स्वत:साठी जीवन जगता असताना दुसऱ्यासाठी जीवन जगल्यास माणसाला मोठा आनंद मिळतो. उन्नती साधून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. देशाची खरी संपत्ती म्हणजे ज्ञान आहे, ज्या देशाचा तरुणांमध्ये बुद्धी गुणांक जास्त तोच देश श्रीमंत असतो, असेही कुलगुरू पाटील म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पाटील होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. नरेंद्र चौधरी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, स्वनील पाटील, अभिनेत्री प्रियंका ठोके, माजी महापौर सुनील महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते समाजातील ५०० गुणवंत विद्यार्थ्यांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
अभ्यासात स्वत:ला झोकून द्या
गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांकडे वेगळ्याप्रकारे बघण्याची भूमिका असते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणजेच यश मिळाले असे नव्हे तर हे यशाचे पहिले पाऊल असते. त्यामुळे आताच मनात ध्येय ठरवुन अभ्यासात स्वत:ला झोकून द्या. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना आपले आवडते क्षेत्र निवडण्यासाठी त्यांना मदत करा. मुलांची निर्णयक्षमता आता वाढली आहे. फेसबुक आणि व्हॉटसअॅप या सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी करा, असेही कुलगुरू प्रा. पाटील म्हणाले. तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून कॉलेज जीवनाकडे वाटचाल करताना याकाळात पूर्ण तन-मन-धन अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. यासोबतच व्यायाम, योगा, खेळ याकडेही लक्ष केंद्रित करण्याचेही ते म्हणाले.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
भारत सर्वात जास्त तरुणांचा देश असल्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन करत असताना जिद्द, चिकाटी, मेहनत करून ध्येय ठरवा अन् वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी केले. ते सरदार वल्लभ्ाभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था व युवा विकास फाउंडेशनने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. प्रत्येकाचे यशाचे पैलू वेगवेगळे असतात. स्वत:साठी जीवन जगता असताना दुसऱ्यासाठी जीवन जगल्यास माणसाला मोठा आनंद मिळतो. उन्नती साधून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. देशाची खरी संपत्ती म्हणजे ज्ञान आहे, ज्या देशाचा तरुणांमध्ये बुद्धी गुणांक जास्त तोच देश श्रीमंत असतो, असेही कुलगुरू पाटील म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पाटील होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. नरेंद्र चौधरी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, स्वनील पाटील, अभिनेत्री प्रियंका ठोके, माजी महापौर सुनील महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते समाजातील ५०० गुणवंत विद्यार्थ्यांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
अभ्यासात स्वत:ला झोकून द्या
गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांकडे वेगळ्याप्रकारे बघण्याची भूमिका असते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणजेच यश मिळाले असे नव्हे तर हे यशाचे पहिले पाऊल असते. त्यामुळे आताच मनात ध्येय ठरवुन अभ्यासात स्वत:ला झोकून द्या. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना आपले आवडते क्षेत्र निवडण्यासाठी त्यांना मदत करा. मुलांची निर्णयक्षमता आता वाढली आहे. फेसबुक आणि व्हॉटसअॅप या सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी करा, असेही कुलगुरू प्रा. पाटील म्हणाले. तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून कॉलेज जीवनाकडे वाटचाल करताना याकाळात पूर्ण तन-मन-धन अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. यासोबतच व्यायाम, योगा, खेळ याकडेही लक्ष केंद्रित करण्याचेही ते म्हणाले.