जळगाव : बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यशराज प्रवीण पाचपोळ (१८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील जेएमएस महाविद्यालयातून यशराज बारावी विज्ञान शाखेतून नुकताच उत्तीर्ण झाला होता. त्याला ६० टक्के मिळाले होते. रविवारी सकाळी १० वाजल्यापासून तो घरातून बेपत्ता झाला होता. पाचपोळ कुटुंबीय आरओ वॉटर सप्लायचे काम करीत असल्यामुळे यशराज पाणी देण्यासाठी गेला असेल असा कुटुंबीयांचा समज झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्यामुळे त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 4:00 am