अ‍ॅपशहर

वाघ वाचला, तर जंगल वाचेल!

जळगाव जिल्ह्यातील वढोदा (मुक्ताईनगर) व यावल वनक्षेत्रात (सातपुडा) वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले असून, वाघाचा हा अधिवास वाचविण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून ‘टायगर रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रॅलीचे प्रमुख व वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक रवींद्र सोनवणे यांनी ‘मटा’शी संवाद साधला. त्यांनी जिल्ह्यातील हा वाघ वाचला, तरच जंगल वाचेल अणि जंगल वाचले, तरच जळगाव जिल्ह्याचा पर्यावरणाचा समतोल राहील, असे स्पष्ट केले.

Maharashtra Times 25 Jul 2016, 4:00 am
जळगाव जिल्ह्यातील वढोदा (मुक्ताईनगर) व यावल वनक्षेत्रात (सातपुडा) वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले असून, वाघाचा हा अधिवास वाचविण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून ‘टायगर रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रॅलीचे प्रमुख व वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक रवींद्र सोनवणे यांनी ‘मटा’शी संवाद साधला. त्यांनी जिल्ह्यातील हा वाघ वाचला, तरच जंगल वाचेल अणि जंगल वाचले, तरच जळगाव जिल्ह्याचा पर्यावरणाचा समतोल राहील, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम talk times ravindra sonavane
वाघ वाचला, तर जंगल वाचेल!


•चारठाणा टायगर रॅली कशासाठी काढली जात आहे?

➤ वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त गेल्या चार वर्षांपासून रॅली काढली जात आहे. तत्कालीन वनक्षेत्रपाल डी. आर. पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात वाघाचे अस्तित्व सर्वप्रथम मान्य केले होते. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी २९ जुलै २०११ मध्ये वनक्षेत्राला भेट देवून वाघाचे अस्तित्व अधोरेखीत केले होते. राज्याचे प्रधान वन सचिव यांनीही वढोदा, डोलारखेडा या क्षेत्रांना भेटी देऊन वाघ असल्याची पुष्टी केली होती. त्यानंतर आजपर्यंत वाघाच्या पाऊलखुणा या जंगलात आढळत आहे. या परिसरातील जनतेने पुढाकार घेतला, तरच वाघाचे संवर्धन शक्य आहे. त्यामुळे या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात वाघाबद्दल जागृती करण्याचा रॅलीचा उद्देश आहे.

•रॅलीच्या माध्यमातून कशाप्रकारे जनजागृती करणार?

➤ व्याघ्रदिनी (२९ जुलै) मोटारसायकल रॅलीस चारठाणा येथून सुरुवात होईल. रॅलीचा मार्ग चारठाणा, निमखेडी, महालखेडा, टाकळी, नांदवेल, डोलारखेडा, सुकळी, दुई, खामखेडा, असा राहील. मुक्ताईनगरला समारोप होईल. रॅलीद्वारे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कसा टाळता येईल, रहिवास क्षेत्रात वन्यजीव आल्यास किंवा येऊ नये म्हणून काय उपायोजना कराव्यात? याबाबत माहिती देण्यात येईल. पत्रक, पथनाट्य, चित्रफित या माध्यमातून, तसेच प्रत्यक्ष संवाद साधून जागृती करण्यात येणार आहे. यासाठी जळगाव वनविभागाचेदेखील सहकार्य मिळत आहे.

•जिल्ह्यातील या वाघाचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून काय अपेक्षा आहेत ?

➤ वढोदा वनक्षेत्रात वाघांचा अधिवास आहे. या प्रकल्पाची ‘मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प’ या नावाने गॅझेटमध्ये अधिकृपणे नोंद करण्यात आली आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्प म्हणून हे क्षेत्र घोषित झाले आहे, मात्र संवर्धनाचे काम महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाघांना मुक्त संचार करता यावा म्हणून व्याघ्र संचार मार्ग (कॅरिडॉर) तयार करणे आवश्यक आहे, तसेच अन्नसाखळीत सर्वोच्चस्थानी असलेला वाघ या भागात असल्याने वनहक्क कायद्यातील कलम ४(२) नुसार या क्षेत्रास क्रिटीकल वाइल्ड लाईफ हॅबिटाईट (संकटग्रस्त वन्यजीव अतिसंवदेनशील क्षेत्र) दर्जा देणे गरजेचे आहे.

•आतापर्यंत काढलेल्या टायगर रॅलीचा काय फायदा झाला?

➤ चारठाणा, डोलारखेडा भागात यापूर्वी काढलेल्या टायगर रॅलीमुळे शेतकरी व रहिवाशांची मानसिकता बदलण्यात काही प्रमाणात यश आले आहे. या भागातील १८ शेतकऱ्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी आपली जमीन संपादीत होऊ देण्यासाठी सकारत्मकता दर्शविली आहे. गावात वन समित्यांद्वारे वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

(शब्दांकन : प्रवीण चौधरी)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज