धर्मसभेत संभाजी भिडे यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
आज देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीअभावी देश रक्तबंबाळ होत आहे, राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्याने देश दु:खी आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा अभिमान जोपर्यंत आपल्या रक्तात येत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ‘वांझ’ आहोत, असेही भिडे यावेळी म्हणाले. शहरातील सरदार वल्लभदास वालजी सभागृहात रविवारी (दि. २७) आयोजित ‘३२ मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा’ याविषयी ते बोलत होते.
आजपर्यंत आपल्या भारत देशावर अनेक राष्ट्रांनी आक्रमण केली. त्यातील सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांचीच संख्या जास्त होती. याची आठवण करून देत भिडे यांनी आजच्या युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागविण्याची गरज असल्याचे मत भिडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात धर्मप्रार्थनेने सुरुवात झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपल्या पूर्वजांचा इतिहास जो समाज वाचत नाही, आत्मसात करत नाही, तो समाज देश-विश्वसंघर्षात वाचणार नाही. छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावरील सुवर्ण सिंहासन नाहीसे झाले. शिवरायांच्या मनाला झालेल्या वेदना पुसून टाकणे व महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच हे सिंहासन पुनर्स्थापना करण्याचा संकल्प ४ जून, २०१७ रोजी लाखो धारकऱ्यांच्या उपस्थितीत रायगडावर घेण्यात आला. ज्या सिंहासनावर बसून महाराजाचा राज्यभिषेक झाला, ते ठिकाण अखंड हिंदुस्थानासाठी पवित्र आहे. म्हणूनच राजदरबारात ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापित करणे गरजेचे आहे, असेही भिडे शेवटी म्हणाले.
पोलिसांकडून बंदोबस्त
शहरातील या धर्मसभेबाबत अनेक बहुजन संघटनांनी विरोध दर्शवत निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या धर्मप्रार्थना सभेला महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच पोलिसांकडूनही या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सभेच्या जागेची पाहणी केली. त्याचबरोबर सभेच्या रस्त्यालगत बॅरिकेड्सही लावण्यात आले होते.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
आज देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीअभावी देश रक्तबंबाळ होत आहे, राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्याने देश दु:खी आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा अभिमान जोपर्यंत आपल्या रक्तात येत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ‘वांझ’ आहोत, असेही भिडे यावेळी म्हणाले. शहरातील सरदार वल्लभदास वालजी सभागृहात रविवारी (दि. २७) आयोजित ‘३२ मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा’ याविषयी ते बोलत होते.
आजपर्यंत आपल्या भारत देशावर अनेक राष्ट्रांनी आक्रमण केली. त्यातील सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांचीच संख्या जास्त होती. याची आठवण करून देत भिडे यांनी आजच्या युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागविण्याची गरज असल्याचे मत भिडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात धर्मप्रार्थनेने सुरुवात झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपल्या पूर्वजांचा इतिहास जो समाज वाचत नाही, आत्मसात करत नाही, तो समाज देश-विश्वसंघर्षात वाचणार नाही. छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावरील सुवर्ण सिंहासन नाहीसे झाले. शिवरायांच्या मनाला झालेल्या वेदना पुसून टाकणे व महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच हे सिंहासन पुनर्स्थापना करण्याचा संकल्प ४ जून, २०१७ रोजी लाखो धारकऱ्यांच्या उपस्थितीत रायगडावर घेण्यात आला. ज्या सिंहासनावर बसून महाराजाचा राज्यभिषेक झाला, ते ठिकाण अखंड हिंदुस्थानासाठी पवित्र आहे. म्हणूनच राजदरबारात ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापित करणे गरजेचे आहे, असेही भिडे शेवटी म्हणाले.
पोलिसांकडून बंदोबस्त
शहरातील या धर्मसभेबाबत अनेक बहुजन संघटनांनी विरोध दर्शवत निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या धर्मप्रार्थना सभेला महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच पोलिसांकडूनही या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सभेच्या जागेची पाहणी केली. त्याचबरोबर सभेच्या रस्त्यालगत बॅरिकेड्सही लावण्यात आले होते.