अ‍ॅपशहर

एकात्मतेचा अभाव हेच राष्ट्रीय सुरक्षेमोर आव्हान

राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येवून कार्य करण्याची गरज आहे. अंतर्गत व बाह्य सुरक्षेसंदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था दिसून येते. राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव आपल्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हेच राष्ट्रीय सुरक्षतेसमोरील मोठे आव्हान आहे, असे मत सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ.जी. डी. बक्षी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2018, 4:00 am
निवृत्त मेजर जनरल डॉ. बक्षी यांचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the lack of integration is the challenge on national security says retired major general dr g d bakshi at jalgaon
एकात्मतेचा अभाव हेच राष्ट्रीय सुरक्षेमोर आव्हान


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येवून कार्य करण्याची गरज आहे. अंतर्गत व बाह्य सुरक्षेसंदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था दिसून येते. राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव आपल्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हेच राष्ट्रीय सुरक्षतेसमोरील मोठे आव्हान आहे, असे मत सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ.जी. डी. बक्षी यांनी व्यक्त केले.

सक्षम आणि बलशाही देश निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक शक्तीचे दर्शन शत्रू राष्ट्रांना करून देण्याची गरज असल्याचे मतही डॉ. जी. डी. बक्षी यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने मंगळवारपासून (दि. २७) ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढील नवीन आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या द्विदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांचेहस्ते करण्यात आले. विचारमंचावर जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, डॉ. अर्चना देगांवकर, डॉ. तुकाराम दौड आणि समन्वयक प्रा. तुषार रायसिंग उपस्थित होते. उद्घाटन सत्रात पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. नागरिकांच्या सहकार्याशिवाय अंतर्गत सुरक्षा बळकट करता येत नाही, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचे मत यावेळी व्यक्त केले.

चाण्यकनिती अवलंबण्याची गरज

उद्घाटन सत्रानंतर मेजर जनरल डॉ. बक्षी यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षिततेचा भारतीय दृष्टिकोन’ या विषयावर बीजभाषण केले. भारतात सुमारे २००० वर्षापूर्वी मौर्य कालखंडात अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या प्रश्नाविषयी आचार्य चाणक्य यांनी ठोस नितीचा अवलंब केला होता. हीच चाणक्यनिती आज अवलंबविणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. सुरक्षा यंत्रणेसाठी इतर देश मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. मात्र भारतात आर्थिक गुंतवणूक इतरांच्या तुलनेत कमी असून, ती वाढविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. भारतापुढे सुरक्षा यंत्रणेचे सक्षमीकरण, राष्ट्रीय एकात्मतेचा विकास आणि ऊर्जा, तेल व पाणी या संदर्भातील स्वावलंबता हे मोठे आव्हान असल्याचे मत त्यांनी बीजभाषणात व्यक्त केले.

चर्चासत्रात दुपारी दोन सत्र घेण्यात आली. यात मुंबई विद्यापीठाचे डॉ. नियाकत खान यांनी ‘भारतातील मिलिटरी सुरक्षेपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयावर तर पुणे विद्यापीठाचे प्रा. श्रीकांत परांजपे यांनी ‘काश्मीर प्रश्न आणि सरकारची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज (दि. २८) द्विदिवसीय चर्चासत्राचा समारोप होणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला आज(दि. २८) सुटी जाहीर करण्यात आली असून, विद्यापीठाच्या २६ व्या पदवीप्रदान समारंभाच्या पूर्वतयारीसाठी रविवारी (दि. २५) विद्यापीठ सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे आज, विद्यापीठाला सुटी जाहीर करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज