अ‍ॅपशहर

शारीरिक शिक्षकाला धक्का पोहचणार नाही

आपल्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करायला पाहिजे. सर्व खेळाडूंना मान-सन्मान मिळत असून, आर्थिक पाठबळही मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा विषय दुर्लक्षित राहिला असून, बरीचशी कारणे मांडली जात नाहीत. आता सध्या कोणत्याही शारीरिक शिक्षकाला धक्का पोहचणार नाही व सरप्लस होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शिक्षण संचालक गंगाराम मम्हाणे यांनी दिली.

महाराष्ट्र टाइम्स 11 Feb 2019, 5:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IMG_20190210_133654


आपल्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करायला पाहिजे. सर्व खेळाडूंना मान-सन्मान मिळत असून, आर्थिक पाठबळही मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा विषय दुर्लक्षित राहिला असून, बरीचशी कारणे मांडली जात नाहीत. आता सध्या कोणत्याही शारीरिक शिक्षकाला धक्का पोहचणार नाही व सरप्लस होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शिक्षण संचालक गंगाराम मम्हाणे यांनी दिली. क्रीडा शिक्षकांना संच मान्यतेत सामावून घेणार तसेच माझ्या पातळीवरील प्रश्न निश्चितपणे सुटतील, असेही मम्हाणे म्हणाले.

शिर्डी येथे आयोजित शारीरिक शिक्षण शिक्षकांचे राज्यस्तरीय महाअधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाचा रविवारी (दि. १०) समारोप झाला. ‘शारीरिक शिक्षणाची गुणवत्ता व मूल्यमापन’ या विषयावर गंगाधर मम्हाणे बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उपसंचालक सुहास पाटील उपस्थित होते. या वेळी विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे, मेजर कुलथे, नंदकुमार सूर्यवंशी यांनी शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत भेडसावत असलेल्या समस्यांबाबत मनोगत व्यक्त केले.

खेळाडू निवडताना पारदर्शकता हवी
शिक्षण क्षेत्रामध्ये शारीरिक शिक्षणाचे स्थान अधोरेखित मानणारे आम्ही प्रशासक आहोत. शारीरिक शिक्षकांच्या पायावर क्रीडा संचलनालय अवलंबून आहे असे मानणारे आम्ही आहोत, असे मत क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केले. क्रीडा स्पर्धा या क्रीडा शिक्षकांच्या मनुष्यबळावरच अवलंबून आहे. ही वस्तूस्थिती असून, तुमच्यातला संघटक हा आमचा गाभा आहे. अनेक खेळाडू कष्ट करीत आहेत. त्यांना योग्य स्थान द्या आणि चुकीचे काम करणाऱ्यांचा पर्दाफाश करा, असे आवाहनही सुहास पाटील यांनी केले. खेळाडू निवड करताना पारदर्शकता हवी. तुम्ही क्रीडा शिक्षक कर्तृत्ववान चळवळीतील कार्यकर्ते असल्याचे समजून सचोटीने काम करा, असेही पाटील यांनी सांगितले. यापूर्वी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी शिक्षण आणि क्रीडा मंत्री वेगवेगळे असायला हवेत, असे मत व्यक्त केले.

अकरा ठराव मांडले
या अधिवेशनात विविध मागण्यांसाठी ११ ठराव मांडण्यात आले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात महेश देशपांडे, मेजर कुलथे, ज्ञानेश काळे, राजेंद्र बनसोडे यांनी ‘शालेय क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन’ या विषयावर प्रकट मुलाखत झाली. या वेळी व्यासपीठावर आप्पासाहेब शिंदे, डॉ. संध्या जिंतूरकर, चंद्रकांत पाटील, सुवर्णा घोलप, राजेश जाधव, प्रतिभा डबीर, संजय पाटील, नीलेश इंगळे, राजेंद्र जगदाळे, महेंद्र हिंगे, राजेंद्र पवार, आनंद पवार, गणेश म्हस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेन्द्र कोहोकडे यांनी केले तर आभार ज्ञानेश काळे यांनी मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज