अ‍ॅपशहर

दूषित पाण्याची समस्या कायम

शहरातील दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. शहरातील अनेक भागात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी साने गुरूजी नगर परिसरातील नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या ठेवल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली.

Maharashtra Times 19 May 2017, 4:00 am
नगरसेवक जोशींचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the problem of contaminated water persists at jalgaon
दूषित पाण्याची समस्या कायम


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. शहरातील अनेक भागात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी साने गुरूजी नगर परिसरातील नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या ठेवल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली. स्थायी सभेत आयुक्तांनी आश्वासन देऊनदेखील पाण्याचे नमूने घेण्यासाठी बोलविले नसल्याचेही जोशी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक भागात पिवळ्या रंगाचा व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, यावर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे मनपाच्या स्थायी सभेत मनसेने अनंत जोशींसह सदस्य आक्रमक झाले होते. यावर आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) च्या अभियंत्यांकडून जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते.

पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी त्यावेळी शहरातील विविध भागातून पाण्याचे नमून घेऊन त्यांची तपासणी केली. यानंतर ते पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आल्याची माहितीही देण्यात आली. यावर अनंत जोशी यांनी नमूने घेताना नगरसेवकांना सोबत न्या, असेही सांगितले होते. त्यानुसार आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला नगरसेवक जोशी यांना नमूने घेण्यासाठी सोबत नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सात दिवस होऊन पाणीपुरवठा विभागाने नमूने घेण्यासाठी बोलवले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज