९९५ पैकी ९६६ परीक्षांचे निकाल ३० दिवसांत
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मार्च ते मे २०१९ या कालावधीत झालेल्या विविध परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली.
दि.२६ मार्च ते ६ जून या ७३ दिवसांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या सत्रानिहाय / शाखा निहाय एकूण ९९५ परीक्षा पार पडल्या. या परीक्षांच्या एकूण ९ लाख २५ हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. यातील बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., अभियांत्रिकी, औषधीनिर्माण, विधी, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन १७ केंद्रांवर ऑनलाइन करण्यात आले. ‘ऑनस्क्रिन मार्किंग’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे शिक्षकांनी हे मूल्यांकन केले. नवीन विद्यापीठ कायद्याच्या कलम ८९ मधील तरतूदीनुसार परीक्षांच्या अखेरच्या दिनांकापासून ३० ते ४५ दिवसांच्या आत निकाल घोषित करण्याची तरतूद आहे. विद्यापीठाच्या ९९५ परीक्षांपैकी ९६६ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले असून, हे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे आहे. उर्वरित २९ परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसांच्या आत जाहीर झाले असून, हे प्रमाण २.९१ टक्के आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दैनंदिन आढावा
निकालाचे कामकाज जलद व कालमर्यादेत पार पाडावे यासाठी मूल्यांकनाचे आदेश शिक्षकांना लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. ईमेल आणि एसएमएसद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून मूल्यांकनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मूल्यांकन केंद्रांवरील प्रकल्प अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून या ग्रुपद्वारे मूल्यांकन केंद्रांवरील शिक्षकांच्या उपस्थितीचा व तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दैनंदिन आढावा घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या. याचबरोबर आलेल्या अडचणींचे निराकारण करण्यात आल्याने निकाल मर्यादित कालावधीच्या आत जाहीर करण्याची परंपरा या वर्षीदेखील विद्यापीठाला कायम राखता आली, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील व विशेष कार्य अधिकारी प्रा. ए. यू. बोरसे यांनी दिली.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मार्च ते मे २०१९ या कालावधीत झालेल्या विविध परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली.
दि.२६ मार्च ते ६ जून या ७३ दिवसांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या सत्रानिहाय / शाखा निहाय एकूण ९९५ परीक्षा पार पडल्या. या परीक्षांच्या एकूण ९ लाख २५ हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. यातील बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., अभियांत्रिकी, औषधीनिर्माण, विधी, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन १७ केंद्रांवर ऑनलाइन करण्यात आले. ‘ऑनस्क्रिन मार्किंग’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे शिक्षकांनी हे मूल्यांकन केले. नवीन विद्यापीठ कायद्याच्या कलम ८९ मधील तरतूदीनुसार परीक्षांच्या अखेरच्या दिनांकापासून ३० ते ४५ दिवसांच्या आत निकाल घोषित करण्याची तरतूद आहे. विद्यापीठाच्या ९९५ परीक्षांपैकी ९६६ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले असून, हे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे आहे. उर्वरित २९ परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसांच्या आत जाहीर झाले असून, हे प्रमाण २.९१ टक्के आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दैनंदिन आढावा
निकालाचे कामकाज जलद व कालमर्यादेत पार पाडावे यासाठी मूल्यांकनाचे आदेश शिक्षकांना लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. ईमेल आणि एसएमएसद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून मूल्यांकनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मूल्यांकन केंद्रांवरील प्रकल्प अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून या ग्रुपद्वारे मूल्यांकन केंद्रांवरील शिक्षकांच्या उपस्थितीचा व तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दैनंदिन आढावा घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या. याचबरोबर आलेल्या अडचणींचे निराकारण करण्यात आल्याने निकाल मर्यादित कालावधीच्या आत जाहीर करण्याची परंपरा या वर्षीदेखील विद्यापीठाला कायम राखता आली, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील व विशेष कार्य अधिकारी प्रा. ए. यू. बोरसे यांनी दिली.