परिषद समारोपप्रसंगी प्राचार्य व्ही. आर. पाटील यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तत्त्वज्ञान विषयात अनेक संशोधक नवीन संशोधन करून ते पुढे आणू पाहत आहेत. अशा संशोधनांना प्रोत्साहन देऊन तत्त्वज्ञानात प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथील जी. जी. खडसे कॉलेजचे प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी केले. येथील मू.जे.महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागातर्फे ११ वी भारतीय महिला दार्शनिक परिषदेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राजस्थान येथील माजी कुलगुरू डॉ. सोहन राज तातर, सुरत येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शैलेश मेहता, दार्शनिक महिला परिषदेच्या अध्यक्षा डॉ. राजकुमारी सिन्हा, कार्याध्यक्षा प्रा. छाया राय, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, संयोजन सचिव व तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. रजनी सिन्हा, संयोजन सचिव डॉ.विजय कंची उपस्थित होते. यानंतर सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध अवॉर्ड रांची विद्यापीठ येथील बिनिता कच्छप यांना देण्यात आला. समारोपाच्या सत्राचे सूत्रसंचालन आश्विन पाटील यांनी केले. तर आभार डॉ. रजनी सिन्हा आणि डॉ. राजकुमारी सिन्हा यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुरेश तायडे, डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. गौरी राणे, प्रा. भाग्यश्री भलवतकर, डॉ. विद्या पाटील, प्रा. विजय लोहार, प्राचार्य अविनाश काटे, प्रा. विश्वजित चौधरी, प्रा. सविता नंदनवार, प्रा. रोशनी पवार, प्रा. बी. एन. केसूर, प्रा. हर्षल पाटील, प्रा. एन. एस. बोरसे, उदय पाठक आदींनी परिश्रम घेतले.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तत्त्वज्ञान विषयात अनेक संशोधक नवीन संशोधन करून ते पुढे आणू पाहत आहेत. अशा संशोधनांना प्रोत्साहन देऊन तत्त्वज्ञानात प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथील जी. जी. खडसे कॉलेजचे प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी केले. येथील मू.जे.महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागातर्फे ११ वी भारतीय महिला दार्शनिक परिषदेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राजस्थान येथील माजी कुलगुरू डॉ. सोहन राज तातर, सुरत येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शैलेश मेहता, दार्शनिक महिला परिषदेच्या अध्यक्षा डॉ. राजकुमारी सिन्हा, कार्याध्यक्षा प्रा. छाया राय, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, संयोजन सचिव व तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. रजनी सिन्हा, संयोजन सचिव डॉ.विजय कंची उपस्थित होते. यानंतर सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध अवॉर्ड रांची विद्यापीठ येथील बिनिता कच्छप यांना देण्यात आला. समारोपाच्या सत्राचे सूत्रसंचालन आश्विन पाटील यांनी केले. तर आभार डॉ. रजनी सिन्हा आणि डॉ. राजकुमारी सिन्हा यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुरेश तायडे, डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. गौरी राणे, प्रा. भाग्यश्री भलवतकर, डॉ. विद्या पाटील, प्रा. विजय लोहार, प्राचार्य अविनाश काटे, प्रा. विश्वजित चौधरी, प्रा. सविता नंदनवार, प्रा. रोशनी पवार, प्रा. बी. एन. केसूर, प्रा. हर्षल पाटील, प्रा. एन. एस. बोरसे, उदय पाठक आदींनी परिश्रम घेतले.