शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रसिद्धीपत्रक
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी मविप्रच्या मुख्य कार्यालयायासमोर दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रसंगी कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक मारहाणप्रकरणी महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांच्यावतीने स्थानिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप दयाराम पाटील प्रसिद्धीपत्रक काढले आहे. याद्वारे पाटील हे आज उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायालयीन दाद मागणार असल्याचे कळविले आहे.
‘मविप्र’चे तथाकथित संचालक विजय भास्कर पाटील, हेमंत साळुंखे, अश्विनी देशमुख, सोनल पवार व इतर गुंडांनी गेल्या ६ महिन्यांपासून नियोजित कट रचून कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक त्रास देणे, दमदाटी, छेडछाड करणे, कॉपी तसेच काहींना काही कारणाने त्रास देणे सुरू केले आहे. तसेच संस्थेशी काही एक संबंध नसताना राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू होते, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाकडे अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी तोंडी व लेखी स्वरूपात केलेल्या होत्या व त्याकडे प्रशासनाकडून सोईस्कररित्या कानाडोळा करण्यात येत होता. सदर आरोपींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असतानासुद्धा आम्हाला पोलिस प्रशासन गुन्हेगारासारखी वागणूक देत होते. याच प्रशासनाच्या वागणुकीमुळे वरील गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी दि. १९ जून रोजी नूतन मराठा आवारात हाणामाऱ्या करून आणि कर्मचाऱ्यांना पळवून लावून तसेच तिथे कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचारी उमेश दगडू धुमाळ याचेवर प्राणघातक हल्ला करून दहशत माजविली, असेही या पत्रकात म्हटले आहे.
सर्व घटनाक्रम पाहता पोलिसांचा दबाव तसेच गुन्हेगारांचा वरील आरोपींचा दबाव या गोष्टीचा कर्मचाऱ्यांवार प्रचंड मानसिक परिणाम होत आहे. प्राणघातक हल्या सदंर्भात दाखल गुन्ह्यात आरोपी विरूद्ध कुठलीही कारवाई होईल यांची कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून तिळमात्रही शक्यता वाटत नाही. याकरिता नूतन मराठा महाविद्यालय जळगावच्या सर्व कर्मचारी यांच्या एकमताने मी स्थानिक कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालय औरंगाबाद येथे आज प्रशासनाविरूद्ध आमच्या सुरक्षेसाठी याचिका दाखल करीत आहे, असे यामध्ये शेवटी म्हटले आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी मविप्रच्या मुख्य कार्यालयायासमोर दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रसंगी कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक मारहाणप्रकरणी महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांच्यावतीने स्थानिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप दयाराम पाटील प्रसिद्धीपत्रक काढले आहे. याद्वारे पाटील हे आज उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायालयीन दाद मागणार असल्याचे कळविले आहे.
‘मविप्र’चे तथाकथित संचालक विजय भास्कर पाटील, हेमंत साळुंखे, अश्विनी देशमुख, सोनल पवार व इतर गुंडांनी गेल्या ६ महिन्यांपासून नियोजित कट रचून कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक त्रास देणे, दमदाटी, छेडछाड करणे, कॉपी तसेच काहींना काही कारणाने त्रास देणे सुरू केले आहे. तसेच संस्थेशी काही एक संबंध नसताना राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू होते, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाकडे अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी तोंडी व लेखी स्वरूपात केलेल्या होत्या व त्याकडे प्रशासनाकडून सोईस्कररित्या कानाडोळा करण्यात येत होता. सदर आरोपींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असतानासुद्धा आम्हाला पोलिस प्रशासन गुन्हेगारासारखी वागणूक देत होते. याच प्रशासनाच्या वागणुकीमुळे वरील गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी दि. १९ जून रोजी नूतन मराठा आवारात हाणामाऱ्या करून आणि कर्मचाऱ्यांना पळवून लावून तसेच तिथे कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचारी उमेश दगडू धुमाळ याचेवर प्राणघातक हल्ला करून दहशत माजविली, असेही या पत्रकात म्हटले आहे.
सर्व घटनाक्रम पाहता पोलिसांचा दबाव तसेच गुन्हेगारांचा वरील आरोपींचा दबाव या गोष्टीचा कर्मचाऱ्यांवार प्रचंड मानसिक परिणाम होत आहे. प्राणघातक हल्या सदंर्भात दाखल गुन्ह्यात आरोपी विरूद्ध कुठलीही कारवाई होईल यांची कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून तिळमात्रही शक्यता वाटत नाही. याकरिता नूतन मराठा महाविद्यालय जळगावच्या सर्व कर्मचारी यांच्या एकमताने मी स्थानिक कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालय औरंगाबाद येथे आज प्रशासनाविरूद्ध आमच्या सुरक्षेसाठी याचिका दाखल करीत आहे, असे यामध्ये शेवटी म्हटले आहे.