अ‍ॅपशहर

शरीराला समजणे हेच ‘योगशास्त्र’

मानवाने आपले शरीर चांगले व स्वस्थ राखणे आणि त्या शरीराला समजणे हेच योगशास्त्र आहे, असे प्रतिपादन बिहार योग विद्यालय, मुंगेर येथील संशोधन संस्थेच्या समन्वयक स्वामी निर्मलानंद सरस्वती यांनी केले. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 'योगसाधना व संपूर्ण आरोग्य' या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी बोलत होते.

Maharashtra Times 30 Jan 2018, 4:00 am
शरीराला समजणे हेच 'योगशास्त्र'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to understand the body is called yoga science
शरीराला समजणे हेच ‘योगशास्त्र’


स्वामी निर्मलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मानवाने आपले शरीर चांगले व स्वस्थ राखणे आणि त्या शरीराला समजणे हेच योगशास्त्र आहे, असे प्रतिपादन बिहार योग विद्यालय, मुंगेर येथील संशोधन संस्थेच्या समन्वयक स्वामी निर्मलानंद सरस्वती यांनी केले. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 'योगसाधना व संपूर्ण आरोग्य' या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी बोलत होत्या.

जागतिक स्तरावर योगमय जीवन आणि योगाभ्यास याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन व्यक्तिमत्व विकास आणि उत्तम जीवनाची अद्वितीय वैज्ञानिक पद्धती विशद करणारे 'योगसाधना व संपूर्ण आरोग्य' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव भ. भा. पाटील, वित्त व लेखाअधिकारी डॉ. बी. डी. कऱ्हाड उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात कुलसचिव भ. भा. पाटील यांनी कर्मयोगाचे उदाहरण देताना, कोणतेही काम करीत असताना त्या कामात आपला शंभर टक्के सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कामामुळे जो आनंद मिळतो तो सर्वोच्च आनंद आहे. नवीन काम व जबाबदारी स्वीकारा यामुळे स्वत:ची व त्यासोबत कुटुंबाचीही प्रगती होईल. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वीकारभाव अंगिकारल्यास सुख-समृद्धी

सेल्फ रियलायझेशन ज्यांनी प्राप्त केले त्याने स्वत:ला ओळखले असे समजायचे, असे मत स्वामी निर्मलानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. तसेच मन प्रसन्न ठेवल्यास शरीर स्वास्थ ठीक राहते. यामुळे कोणताही आजार होणार नाही, क्रोध टाळण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा, स्वीकारभाव अंगिकारल्यास जीवनात सुख-समृद्धी निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या. यासोबतच इष्टदेवाचे रूप स्वत:मध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही कार्य करण्याआधी अपेक्षा बाळगणे चांगले पण त्यासाठी कार्य सुरू करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. हठयोग, राजयोग, भक्तीयोग, कर्मयोग या साधना केल्याने कोणत्या प्रकारचा फायदा होतो हे उदाहरणासह त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज