अ‍ॅपशहर

जिल्ह्यात दीड लाख शौचालयांची निर्मिती

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५७ हजार ५६७ वैयक्तिक शौचालयांची निर्मिती पूर्ण झाली आहे.

Maharashtra Times 20 Oct 2017, 4:50 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम toilet complite in jalgaon dist
जिल्ह्यात दीड लाख शौचालयांची निर्मिती


केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५७ हजार ५६७ वैयक्तिक शौचालयांची निर्मिती पूर्ण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील बोदवड व भुसावळ हे दोन तालुके व ४९५ ग्रामपंचायती संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर सर्वाधिक वैयक्तिक शौचालये १३ हजार ५३७ मुक्ताईनगर तालुक्यात बांधण्यात आली असून, सर्वात कमी जळगाव तालुक्यातील संख्या आहे.

जिल्ह्यातही पूर्वी वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण अत्यल्प होते. परंतु, या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी जळगाव जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. याची परिणीती म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मिती होत असून, सध्याला हे प्रमाण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. यापुढील नियोजनवरही जिल्हा प्रशासनाचा भर आहे.

यंत्रणा प्रयत्नशील

आतापर्यंत तब्बल १ लाख ५७ हजार ५६७ वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. तसेच जिल्ह्यात बोदवड व भुसावळ हे दोन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहेत. मुक्ताईनगर, धरणगाव, रावेर, भडगाव हे तालुकेसुद्धा लवकरच संपूर्ण हागणदारी मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर जिल्ह्यातील ११५१ पैकी ४९५ ग्रामपंचायतीपैकी संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्याला वैयक्तिक शौचालयांचे ३ लाख २४ हजार ७५८ इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आजपर्यंत १ लाख ५७ हजार ५६७ वैयक्तिक घरगुती शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज