अ‍ॅपशहर

गुरे चारण्यावरून वाद

साक्री तालुक्यातील निमाजपूर गावाजवळील माळगाव शिवारात मंगळवारी (दि. १२) दुपारी पारधी समाजाने ठेलारींच्या वस्तीवर जोरदार हल्ला चढविला. गुरे चारण्यावरून झालेल्या या वादात दहा ते बारा जण जखमी झाले असून, यात काही जणांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Maharashtra Times 13 Sep 2018, 5:00 am
निजामपूरजवळ दोन समाजांमध्ये तेढ; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two community dispute at nijampur malgaon area police took action
गुरे चारण्यावरून वाद


म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील निमाजपूर गावाजवळील माळगाव शिवारात मंगळवारी दुपारी पारधी समाजाने ठेलारींच्या वस्तीवर जोरदार हल्ला चढविला. गुरे चारण्यावरून झालेल्या या वादात दहा ते बारा जण जखमी झाले असून, यात काही जणांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.

माळगाव शिवारात मंगळवारी राईनपाडा हल्ल्याची पुनरावृत्ती पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपाने टळली. दरम्यान, मंगळवारी दुपारी दोन समाजांमध्ये वनजमिनीवर गुरे चारण्यावरून वाद झाला. यामध्ये हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. मात्र, दोन हल्लेखोर ताब्यात सापडले. त्यांना जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच निजामपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही हल्लेखोरांना वाचविल्याने त्यांचे प्राण वाचले. अन्यथा राईनपाडा घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता होती. या प्रकरणी घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनी पथकासह धाव घेत परिस्थिती नियंत्रणात मिळवून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, दोन्ही समाजांतील पंचवीसहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज