अ‍ॅपशहर

उपमहापौरांकडून मलेरिया विभागाची कानउघाडणी

शहरात गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजारांसह डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य नसल्याने गुरुवारी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी मलेरिया विभागाचे सुनील पांडे यांची कानउघाडणी केली. तसेच फवारणीसह, अबेटिंग करण्याच्या उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Maharashtra Times 28 Sep 2018, 5:00 am
शहरात फवारणीसह उपाययोजना सुरू ठेवण्याच्या सूचना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IMG20180927140046


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरात गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजारांसह डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य नसल्याने गुरुवारी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी मलेरिया विभागाचे सुनील पांडे यांची कानउघाडणी केली. तसेच फवारणीसह, अबेटिंग करण्याच्या उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जळगाव शहरात डेंग्यू फोफावत असून, गेल्या काही महिन्यांत ६० डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शहरातील उच्चभ्रू भागात डेंग्यूच्या अळ्यादेखील आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यूमुळे कुठल्याही नागरिकाचा बळी जाणार नाही, अशा पद्धतीने कामे करण्याच्या सूचना उपमहापौरांनी यावेळी दिल्या. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यास खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी दर आठवड्यात मलेरिया विभागाकडून प्रत्येक वॉर्डात जाऊन पाण्याच्या साठ्यांमध्ये अबेटिंग करणे, पाण्याची डबकी, कचरा नाल्यामध्ये नियमित फवारणी करण्याच्या सूचनाही त्यांनी मलेरिया विभागाला दिल्या. या वेळी नगरसेवक धीरज सोनवणे, अतुल हाडा, मनोज काळे आदी उपस्थित होते.

तक्रारीनंतर आढावा
मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विविध विभागातील ८० कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मलेरिया विभागात नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात औषध व धूर फवारणीच्या कामाला सुरुवात करण्यात येऊन घरोघरी जावून पाण्याच्या साठ्यांची तपासणीदेखील मलेरिया विभागाकडून करण्यात येत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलेरिया विभागाकडून होणाऱ्या या उपाययोजना बंद करण्यात आल्याच्या तक्रारी उपमहापौर डॉ. सोनवणे यांच्याकडे आल्या प्राप्त झाल्या. त्यानुसार उपमहापौर यांनी मलेरिया विभागाचे प्रमुख सुनील पांडे यांना बोलावून त्यांच्याकडून शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

मटाभूमिका
शहरात डेंग्यू सदृश रुग्णांत वाढ झाली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला फारसे यश येत नसतांनाच याकडे प्रशासन पुरेशा गांभीर्याने पाहात नसल्याने सामान्य जळगवाकरांच्या जिवाशीच खेळ चालला आहे. धुरळणीसारखे प्रतिबंधात्मक उपाय करूनही खरेतर ही साथ आटोक्यात आणता आली असती, पण तेवढीही काळजी घेतली जाणार नसेल तर ते योग्य नाही. वॉर्डनिहाय आढाव्यात यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज