अ‍ॅपशहर

जळगावकरांना ‘पीएच’वाढीचा धोका

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील पाण्याच्या पीएचचे (अॅसिड व केमिकल) प्रमाण वाढून आठ झाले आहे. हा वाढता पीएच जलशुद्धीकरण प्रक्रिया अद्यावत करून वेळीच न रोखल्यास जळगावकरांना आरोग्याच्या दृष्टीने धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 10 Sep 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waghur dam water
जळगावकरांना ‘पीएच’वाढीचा धोका


जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील पाण्याच्या पीएचचे (अॅसिड व केमिकल) प्रमाण वाढून आठ झाले आहे. हा वाढता पीएच जलशुद्धीकरण प्रक्रिया अद्यावत करून वेळीच न रोखल्यास जळगावकरांना आरोग्याच्या दृष्टीने धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. अजून दीड वर्ष पुरेल इतके पाणी उपलब्ध असल्याने जळगावकरांना दिलासा आहे मात्र, पावसाळ्यानंतर अनेकदा या पाण्यातील पीएचच्या प्रमाणात होणारी वाढ प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होणे, पाण्याला दुर्गंधी येणे आदी समस्या येतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने जळगावकरांना आरोग्याचा धोका आहे. त्या दृष्टीने मनपाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पीएच म्हणजे काय ?

पॉवर ऑफ हायड्रोजन.
पाण्यात असलेले अॅसिड, केमिकल यांचे प्रमाण.
पिण्याच्या पाण्याची शुद्धता मोजण्यासाठी पीएच हे प्रमाण आहे.

पीएचचे प्रमाण आठवर

पाण्यात असलेल्या पीएचचे प्रमाण हे ६.५ ते ७.५ अपेक्षित आहे. त्यापेक्षा प्रमाण जास्त झाले की, ते पाणी पिण्यासाठी अयोग्य ठरते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वाघूर धरणातील पाण्यातील पीएचचे प्रमाण आठ झाल्याचे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या अधिका-यांनी आयुक्तांना कळविले आहे. पीएचचे प्रमाण आठ असले, तरी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेनंतर हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण आठपेक्षा हे प्रमाण वाढले, तर हे पाणी पिण्यासाठी अयोग्य ठरू शकते.

का वाढते पीएचचे प्रमाण ?

वाघूर धरणात ज्या ठिकाणी पाणी अडविले जाते तेथून महापालिका पाणीपुरवठ्यासाठी पाणी उचलते. हे पाणी थांबलेले (साचलेले) असते. महापालिकेकडून धरणाच्या अगदी खालच्या भागातून पाणी उचलण्यात येते. त्यामुळे याठिकाणी असलेल्या गाळामुळे क्षार जास्त असण्याचा संभव असतो.

अद्यावत प्रक्रियेसाठी प्रस्ताव

महापालिका जलशुद्धीकरणासाठी आजही जुन्या पद्धतीप्रमाणे अलम, ब्लिचिंग व क्लोरीन या साधनांचा वापर करते. पीएचमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन या यंत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज