अ‍ॅपशहर

जिल्ह्यात ४७ गावांत टँकरने पाणीपुरवठा

ऐन पावसाळ्यात जून अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये २५ टँकर सुरू आहेत. यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३३ गावात टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Maharashtra Times 28 Jun 2017, 4:00 am
जळगाव : ऐन पावसाळ्यात जून अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये २५ टँकर सुरू आहेत. यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३३ गावात टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water supply to tankers in 47 villages in the jalgaon district
जिल्ह्यात ४७ गावांत टँकरने पाणीपुरवठा


जिल्ह्यातील एकूण ४७ गावांमध्ये ९ शासकीय व १६ खाजगी अशा २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात जळगाव तालुक्यात १, जामनेर तालुक्यात ६, अमळनेर तालुक्यात ३३, भुसावळ १, व पारोळा तालुक्यातील ६ अशा एकूण ४७ गावांचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३३ गावांमध्ये १४ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासह जळगाव तालुक्यात १, जामनेर तालुक्यात ५, पारोळा तालुक्यात ४ व भुसावळात १ असे ११ टँकर सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज