वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शौचे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला; ‘अविष्कार’ला जल्लोषात सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
संशोधनाच्या संकल्पना केवळ स्पर्धेपूरत्या मर्यादित न ठेवता हे संशोधन बाजारपेठेत आणण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, असा सल्ला नॅशनल सेंटर फोर सेल सायन्स, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी (दि. २७) आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ प्रशाळास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. शौचे बोलत होते. या वेळी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. शौचे म्हणाले की, विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण कल्पनांची वानवा नसते. मात्र, बाजारपेठेचे कौशल्य आणि आर्थिक पाठबळ या गोष्टींअभावी विद्यार्थी मागे राहतात. स्टार्टअपच्या माध्यमातून भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले संशोधन बाजारपेठेत आणावे, त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाला विद्यापीठाच्या वतीने अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली. विद्यापीठाला बहिणाबार्इंचे नाव दिले असल्यामुळे विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत अधिक पारितोषिके मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी अविष्कारचे समन्वयक प्रा. भूषण चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले. प्रा. दीपक दलाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पर्यावरणपूरक यंत्रावर भर
कर्णबधीरांसाठी श्रवण यंत्राची निर्मिती, शेवाळापासून इथेनॉलची निर्मिती, भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी टिकविणे, पर्यावरणाला अनुकूल असे रस्ते वेस्टेज प्लास्टिकपासून तयार करणे, अंड्यांपासून हायड्रोलिक अॅपिटाईल तयार करणे, वनस्पतीपासून थॉयमल निर्मिती करणे यासोबतच सर्वसामान्यांना परवडणारी कमी खर्चात अशी मिनीकारचे मॉडेलही या स्पर्धेत सादर करण्यात आले. जळगाव, धुळे, नंदूरबार व विद्यापीठ प्रशाळा येथे झालेल्या चारही अविष्कार संशोधन स्पर्धेतून विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे रात्री उशिरापर्यंत आज (दि. २८) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत. विद्यापीठात दि. २ व ३ जानेवारीला विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धा होणार आहेत.
अविष्कारची वैशिष्ट्ये...
एकूण १६० प्रवेशिका
आठ पर्यावरणपूरक मॉड्यूल्स
विविध विषयांवरील १५२ पोस्टर
पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गटांचा समावेश
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
संशोधनाच्या संकल्पना केवळ स्पर्धेपूरत्या मर्यादित न ठेवता हे संशोधन बाजारपेठेत आणण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, असा सल्ला नॅशनल सेंटर फोर सेल सायन्स, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी (दि. २७) आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ प्रशाळास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. शौचे बोलत होते. या वेळी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. शौचे म्हणाले की, विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण कल्पनांची वानवा नसते. मात्र, बाजारपेठेचे कौशल्य आणि आर्थिक पाठबळ या गोष्टींअभावी विद्यार्थी मागे राहतात. स्टार्टअपच्या माध्यमातून भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले संशोधन बाजारपेठेत आणावे, त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाला विद्यापीठाच्या वतीने अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली. विद्यापीठाला बहिणाबार्इंचे नाव दिले असल्यामुळे विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत अधिक पारितोषिके मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी अविष्कारचे समन्वयक प्रा. भूषण चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले. प्रा. दीपक दलाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पर्यावरणपूरक यंत्रावर भर
कर्णबधीरांसाठी श्रवण यंत्राची निर्मिती, शेवाळापासून इथेनॉलची निर्मिती, भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी टिकविणे, पर्यावरणाला अनुकूल असे रस्ते वेस्टेज प्लास्टिकपासून तयार करणे, अंड्यांपासून हायड्रोलिक अॅपिटाईल तयार करणे, वनस्पतीपासून थॉयमल निर्मिती करणे यासोबतच सर्वसामान्यांना परवडणारी कमी खर्चात अशी मिनीकारचे मॉडेलही या स्पर्धेत सादर करण्यात आले. जळगाव, धुळे, नंदूरबार व विद्यापीठ प्रशाळा येथे झालेल्या चारही अविष्कार संशोधन स्पर्धेतून विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे रात्री उशिरापर्यंत आज (दि. २८) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत. विद्यापीठात दि. २ व ३ जानेवारीला विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धा होणार आहेत.
अविष्कारची वैशिष्ट्ये...
एकूण १६० प्रवेशिका
आठ पर्यावरणपूरक मॉड्यूल्स
विविध विषयांवरील १५२ पोस्टर
पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गटांचा समावेश