जळगाव : एका विवाहितेने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या (Jalgaon Women Suicide) केल्याची घटना आज पहाटे जळगावातील प्रेमनगर रेल्वे रुळावर घडली आहे. ऐन वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी घटलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे खळबळ उडाली आहे. माधुरी राजेंद्र जाधव (वय ३१, रा. आव्हाने, ता. जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील माहेर असलेल्या माधुरी यांचा सन २००७ मध्ये आव्हाणे येथील राजेंद्र दिलीप जाधव याच्याशी विवाह झाला होता. सासरी आलेल्या माधुरीचा काही दिवसातच घरगुती कारणांवरुन पतीसह सासू, सासऱ्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. तीन वर्षांनी माधुरी हिला मुलगी झाली. पहिलीच मुलगी झाली म्हणून तिला कुटुंबातील लोक हिणवू लागले. तसेच पती राजेंद्र याचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे म्हशी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे अशी मागणी करु लागले.
चार वर्षानंतर माधुरीला पुन्हा मुलगी झाली. ‘तुला मुलगा होत नाही’ असं म्हणत माधुरीचा सासरच्यांकडून होणारा छळ वाढला. त्यानतंर माधुरीची इच्छा नसतानाही तिला जबरदस्तीने माहेरी सोडून दिले. माधुरीने विनंती करुनही पती राजेंद्र याने तिला घरी नेले नाही. यानंतर सन २०१८ मध्ये माधुरीने पती, सासू, सासरे व जेठ यांच्याविरुद्ध शिंदखेडा येथे न्यायालयात खासगी खटला दाखल केला.
दरम्यान, काल बुधवारी २३ जून रोजी माधुरी हिला दोन्ही मुलींची खूप आठवण येत असल्यामुळे ती एकटीच एसटी बसने आव्हाने येथे सासरी निघून आली. परंतु, सासरच्या लोकांनी तिला अंगणातच मारहाण करुन हाकलून दिले. यामुळे तिने तालुका पोलिसात फिर्याद देखील केली. त्यानतंर ती जळगावातील बहिणीकडे रात्री थांबली होती. पहाटे माधुरी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिने प्रेम नगराजवळील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सासरी दिलेल्या त्रासामुळेच माधुरीने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. त्या अनुशंगाने माधुरीचे वडील रामचंद्र वामन पवार (वय ६२, रा. पढावद, ता. शिंदखेडा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माधुरीचा पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासू संजुबाई दिलीप जाधव, जेठ चंद्रकांत दिलीप जाधव (सर्व रा. आव्हाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार वर्षानंतर माधुरीला पुन्हा मुलगी झाली. ‘तुला मुलगा होत नाही’ असं म्हणत माधुरीचा सासरच्यांकडून होणारा छळ वाढला. त्यानतंर माधुरीची इच्छा नसतानाही तिला जबरदस्तीने माहेरी सोडून दिले. माधुरीने विनंती करुनही पती राजेंद्र याने तिला घरी नेले नाही. यानंतर सन २०१८ मध्ये माधुरीने पती, सासू, सासरे व जेठ यांच्याविरुद्ध शिंदखेडा येथे न्यायालयात खासगी खटला दाखल केला.
दरम्यान, काल बुधवारी २३ जून रोजी माधुरी हिला दोन्ही मुलींची खूप आठवण येत असल्यामुळे ती एकटीच एसटी बसने आव्हाने येथे सासरी निघून आली. परंतु, सासरच्या लोकांनी तिला अंगणातच मारहाण करुन हाकलून दिले. यामुळे तिने तालुका पोलिसात फिर्याद देखील केली. त्यानतंर ती जळगावातील बहिणीकडे रात्री थांबली होती. पहाटे माधुरी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिने प्रेम नगराजवळील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सासरी दिलेल्या त्रासामुळेच माधुरीने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. त्या अनुशंगाने माधुरीचे वडील रामचंद्र वामन पवार (वय ६२, रा. पढावद, ता. शिंदखेडा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माधुरीचा पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासू संजुबाई दिलीप जाधव, जेठ चंद्रकांत दिलीप जाधव (सर्व रा. आव्हाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.