अ‍ॅपशहर

शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

गर्भपात शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेची प्रकृती खालावल्यानंतर दोन दिवसांत तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली. यामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शीलाबाई पद्मसिंग राजपूत (वय ३३, रा. पळासखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे.

Maharashtra Times 23 Jul 2019, 4:00 am
डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman dies after surgery in jalgaon government hospital
शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गर्भपात शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेची प्रकृती खालावल्यानंतर दोन दिवसांत तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली. यामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शीलाबाई पद्मसिंग राजपूत (वय ३३, रा. पळासखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे.

शीलाबाई या गर्भवती असल्यामुळे शनिवारी (दि. २०) त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा गर्भपात करावा लागला. यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. तसेच उपचार सुरू असताना त्यांच्या रक्तदाब वाढला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे यासाठी रविवारी रात्री कुटुंबीयांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. नखाते यांना बोलविण्याची मागणी केली. मात्र, फोन करूनही ते आले नाहीत. सोमवारी सकाळी १०.३० वाजता शीलाबाई यांचा मृत्यू झाला. शीलाबाई यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

..

चाळीसगावात मिठाचा बनावट साठा पकडला;

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

येथील बसस्थानकाजवळील शुभम किराणा दुकानावर छापा टाकून चार लाख रुपये किमतीचा २० टन टाटा मिठाचा बनावट साठा शहर पोलिस व टाटा कपंनीने नेमलेल्या आय. पी. च्या तपास पथकाने सोमवारी (दि. २२) पकडला आहे.

चाळीसगाव शहरात टाटा सॉल्ट कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट मीठ विकले जात असल्याची माहिती आय. पी. संस्थेला मिळाली होती. त्यानुसार कंपनीचे वरिष्ठ रिजनल मॅनेजर मोहम्मद हुसेन चौधरी, त्यांचे सहकारी लक्ष्मण विश्वकर्मा, अनुप कोलप व अनिल मोरे यांनी शहरात तपासणी करताना बस स्थानकाजवळील शुभम किराणा या दुकानावर बनावट मिठाचे पाकिट मिळून आले. मिठाच्या पाकिटावरील डिझाइन, व प्रिटिंगवरील रंगात बदल दिसल्याने बनावट मीठ विकत असल्याचे त्यांची खात्री झाली. या पथकाने दुकानदार विनोद पारसमल कोठारी याला सोबत घेत गोडावूनच्या बाहेरील मिठाच्या गोण्या तपासल्यावर त्यांच्यामध्ये व टाटा सॉल्ट कंपनीच्या मिठाच्या पाकिटांमध्ये तफावत आढळली. या प्रकरणी मोहम्मद हुसेन चौधरी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज