अ‍ॅपशहर

महिलांनी करावे वेळेचे व्यवस्थापन

महिलांनी कार्यालयात काम करताना वेळेचे व्यवस्थापन करून स्वत:मध्ये असलेल्या क्षमता ओळखाव्या. प्रसंगी जे काम जमणारे नाही ते नाही म्हणायला शिकायला हवे म्हणजे कोणतेही ताणतणाव येणार नाहीत, असे मत मानसशास्त्राच्या अभ्यासक डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 25 Sep 2018, 5:00 am
डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम women do time management says aparna asthputre in jalgaon program
महिलांनी करावे वेळेचे व्यवस्थापन


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महिलांनी कार्यालयात काम करताना वेळेचे व्यवस्थापन करून स्वत:मध्ये असलेल्या क्षमता ओळखाव्या. प्रसंगी जे काम जमणारे नाही ते नाही म्हणायला शिकायला हवे म्हणजे कोणतेही ताणतणाव येणार नाहीत, असे मत मानसशास्त्राच्या अभ्यासक डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ‘मनस्विनी’ या महिला समूहाच्या वतीने सोमवारी डॉ. अष्टपुत्रे यांचे ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर डॉ. रत्नमाला बेंद्रे या अध्यक्षस्थानी होत्या.

स्त्रिया अधिक भावनिक असतात कारण त्यांचा मेंदू त्याप्रमाणे विकसित होत असतो. वेळेचे व्यवस्थापन, नाही म्हणायला शिकणे, कामाची विभागणी, स्वत:मधील क्षमतांची ओळख या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर ताण येणार नाही, असे डॉ. अपर्णा अष्टपुत्रे म्हणाल्या. ज्या गोष्टीमुळे त्रास होतो त्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा असेही त्या म्हणाल्या.

बहिणाबाईंच्या गीतांचे सादरीकरण
डॉ. रत्नमाला बेंद्रे यांनी महिलांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक केले. व्याख्यानाच्या आधी ‘मनस्विनी’च्या सुरेखा पाटील, चित्रांगा चौधरी, संगीता पुनाजी पाटील, संगीता सुभाष पाटील, प्रिती सोनी, निता शिंदे, माया जाधव, कल्पना गावंडे, शीतल कढरे या महिलांनी व सपना बाविस्कर, निशा पाटील या विद्यार्थिनींनी ‘महाराणीचा दरबार’ ही नाटिका सादर केली. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या दोन गीतांचे सादरीकरण केले. संगीता सुभाष पाटील यांनी बहिणाबाई साकारल्या. प्रा. पवित्रा पाटील, पुष्पा पाटील, कल्पना गावंडे, मनीषा कंडारे, सुशीला शिंदे यांनीदेखील वैयक्तिक सादरीकरण केले. वैशाली शर्मा व चित्रा कोळी यांनी ‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ या उपक्रमाचे महत्त्व सांगून उपस्थित महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. निशिगंधा सोळंखे या विद्यार्थिनीला संयोजक मनस्विनीच्या वतीने पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रा. माहुलीकर यांच्या हस्ते देण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज