जळगाव: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आता ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ठिणगी पडली आहे. खडसे कुटुंबात नणंद व भावजय यांच्यात यावरून शाब्दिक चकमक झडली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहीणी खडसे यांनी, ‘भाजपाला ओबीसींचा कधीपासून कळवळा यायला लागला’ या आशयाचे ट्वीट केले असता त्यावर खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी, 'रोहिणी खडसे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने त्यांना पक्षाने सांगितले म्हणून त्या बोलत असाव्यात', असा टोला लगावला आहे. ( OBC Reservation In Maharashtra Update ) वाचा: धोका पत्करू नका!; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद- भावजय यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही', असे ट्वीट रोहिणी यांनी केले आहे.
वाचा: 'आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी'
रोहिणी खडसे यांच्या या टीकेला एकनाथ खडसेंच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही पत्रकारांशी बोलताना जोरदार उत्तर दिलं आहे. रोहिणी खडसे या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी टीप्पणीही रक्षा खडसे यांनी पुढे जोडली. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचेही खासदार खडसे यांनी सांगितले.
वाचा: 'अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात'; मुख्यमंत्र्यांचा टोला
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद- भावजय यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही', असे ट्वीट रोहिणी यांनी केले आहे.
वाचा: 'आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी'
रोहिणी खडसे यांच्या या टीकेला एकनाथ खडसेंच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही पत्रकारांशी बोलताना जोरदार उत्तर दिलं आहे. रोहिणी खडसे या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी टीप्पणीही रक्षा खडसे यांनी पुढे जोडली. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचेही खासदार खडसे यांनी सांगितले.
वाचा: 'अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात'; मुख्यमंत्र्यांचा टोला