जालना : उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं नाही तर त्यांची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. अब्दुल सत्तार आज जालना दौऱ्यावर होते, यावेळी त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती, असं अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे हे वेड्यासारखी विधानं करतात, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. चंद्रकात खैरेंना गणिताची टोटलच कळत नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. जालन्यात हिंदू गर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेतलं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असं सत्तार यांनी म्हटलंय.
आसाममध्ये मोठी दुर्घटना, ३० जणांना घेऊन जाणारी नाव बह्मपुत्रेत उलटली, अनेकजण बेपत्ता
अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती करण्यासाठी गेलो होतो,अशी प्रतिक्रीया कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिली आहे. एकनाथ शिंदे हे युपीएच्या काळात आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते असा गौप्यस्फोट देखील अशोक चव्हाणांनी केला होता. मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो होतो, असं सत्तार म्हणाले.
चंद्रकांतं खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही, असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केलीये.पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल बोलण्यास मात्र सत्तार यांनी नकार दिला.
बुमराला झालेलं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय आणि त्यावर शस्त्रक्रीया का केली जाणार नाही, जाणून घ्या...
३५-४० वर्षापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं ? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तेपासून भरपूर मिळवलं परंतु शिवसेना कार्यकर्त्यांना सत्ता असूनही काहीही भोगता आलं नाही.आम्हाला मात्र शिवभोजन थाळी विकायला लावली अशा शब्दांत हेमंत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली.
बुमराला पाठिची दुखापत होणार हे भाकित महान गोलंदाजाने वर्तवले होते, पाहा काय म्हटलं होतं
चंद्रकांत खैरे हे वेड्यासारखी विधानं करतात, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. चंद्रकात खैरेंना गणिताची टोटलच कळत नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. जालन्यात हिंदू गर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेतलं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असं सत्तार यांनी म्हटलंय.
आसाममध्ये मोठी दुर्घटना, ३० जणांना घेऊन जाणारी नाव बह्मपुत्रेत उलटली, अनेकजण बेपत्ता
अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती करण्यासाठी गेलो होतो,अशी प्रतिक्रीया कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिली आहे. एकनाथ शिंदे हे युपीएच्या काळात आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते असा गौप्यस्फोट देखील अशोक चव्हाणांनी केला होता. मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो होतो, असं सत्तार म्हणाले.
चंद्रकांतं खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही, असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केलीये.पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल बोलण्यास मात्र सत्तार यांनी नकार दिला.
बुमराला झालेलं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय आणि त्यावर शस्त्रक्रीया का केली जाणार नाही, जाणून घ्या...
३५-४० वर्षापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं ? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तेपासून भरपूर मिळवलं परंतु शिवसेना कार्यकर्त्यांना सत्ता असूनही काहीही भोगता आलं नाही.आम्हाला मात्र शिवभोजन थाळी विकायला लावली अशा शब्दांत हेमंत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली.
बुमराला पाठिची दुखापत होणार हे भाकित महान गोलंदाजाने वर्तवले होते, पाहा काय म्हटलं होतं