अ‍ॅपशहर

राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाचा मोदी सरकारचा डाव, बँक कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणावरून आता वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा पर्याय निवडला आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2022, 2:10 pm
लातूर : राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करण्यात येऊ नये, पेन्शन योजना लागू करावी, बँकांतील कामगारांचे कंत्राटीकरण बंद करा आदी मागण्यासाठी राज्यभरातील राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर गेले आहेत. मोदी सरकार विविध सरकारी अस्थपनांचे खासगीकरण करत आहे. आता या सरकारची नजर राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणावर आहे. मात्र, सरकारचा हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नसल्याचा मानस बँक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम latur news today
latur news today


धक्कादायक! बादलीमध्ये सापडले आठ कान, मानवी डोके, हात; १५ वर्ष बंद गाळ्यात नेमकं काय घडलं?
राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण हे केवळ बँक कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर ग्राहकांसाठी धोक्याचे आहे. मोठ्या कष्टाने जमा केलेली पुंजी ग्राहक या बँकांमध्ये विश्वासाने ठेवतो.

मात्र, या बँकांचे खासगीकरण झाले तर या ठेवी ठराविक लोकांच्या हाती जातील. त्यामुळे ग्राहकांनीही या लद्यात सामील होण गरजेचं आहे. विशेषतः महिलांनी. त्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचं बँक कर्मचारी सांगतात.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख