कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना महामारीच्या काळात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचं केंद्र सरकारने काय केले? असा जाब विचारत जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर व पक्षाचे प्रदेश सदस्य धनंजय महाडीक यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी पोलिस, भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ( Youth Congress Protests In Front Of Chandrakant Patil 's House )
वाचा: बाप्पा पावला! कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे सोडणार १६२ गाड्या
पंतप्रधान मोदींनी करोनाच्या काळात मोठा निधी जाहीर केला. पण तो जनतेपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाडिक यांच्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यांना अडविण्यासाठी आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात इंद्रजित साळोखे, कल्याणी माणगावे, ऋषीकेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलकांना सामोरे जाण्याऐवजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी देवघरात पूजा करण्यात धन्यता मानली असा आरोप यावेळी माणगावे यांनी केला
वाचा: यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देता येणार नाही: अजित पवार
कहाँ गए वो २० लाख करोड?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहाँ गए वो २० लाख करोड? या प्रश्नाची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती का वाटते? असा सवाल सत्यजीत तांबे यांनी यावेळी विचारला. मुंबईतील आंदोलनात सत्यजीत तांबे यांच्याबरोबर उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, विधी विभागाच्या समन्वयक करीना झेविअर आणि प्रवक्ते आंनद सिंह हेही सहभागी होते. सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या राज्यव्यापी 'हटके' आंदोलनात १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गावोगावी, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या २० लाख करोडच्या पॅकेजचा काही लाभ मिळाला की नाही याची माहिती घेतली तसेच लघु, छोटे व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापारी, दुकाने, कारखान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मोदींच्या दाव्यांची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतले. नोकरदार व बेरोजगार युवकांनाही या पॅकेजबद्दल विचारले पण कोणत्याच घटकाला या पॅकेजमधून काहीही मिळालेले नाही, असे समोर आले. १० ऑगस्टपासून ४ दिवस शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, नोकरदारांशी केलेल्या संवादानंतर आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज युवक काँग्रेसने राज्यातील सर्व भाजपा कार्यालये व खासदारांच्या घरासमोर जाऊन त्यांनाच २० लाख करोड नक्की कुठे गेले, अशी विचारणा केली. या आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केले.
वाचा: फडणवीसांच्या संभाव्य प्रमोशनवर काँग्रेस नेत्याची टोलेबाजी
वाचा: बाप्पा पावला! कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे सोडणार १६२ गाड्या
पंतप्रधान मोदींनी करोनाच्या काळात मोठा निधी जाहीर केला. पण तो जनतेपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाडिक यांच्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यांना अडविण्यासाठी आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात इंद्रजित साळोखे, कल्याणी माणगावे, ऋषीकेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलकांना सामोरे जाण्याऐवजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी देवघरात पूजा करण्यात धन्यता मानली असा आरोप यावेळी माणगावे यांनी केला
वाचा: यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देता येणार नाही: अजित पवार
कहाँ गए वो २० लाख करोड?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहाँ गए वो २० लाख करोड? या प्रश्नाची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती का वाटते? असा सवाल सत्यजीत तांबे यांनी यावेळी विचारला. मुंबईतील आंदोलनात सत्यजीत तांबे यांच्याबरोबर उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, विधी विभागाच्या समन्वयक करीना झेविअर आणि प्रवक्ते आंनद सिंह हेही सहभागी होते. सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या राज्यव्यापी 'हटके' आंदोलनात १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गावोगावी, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या २० लाख करोडच्या पॅकेजचा काही लाभ मिळाला की नाही याची माहिती घेतली तसेच लघु, छोटे व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापारी, दुकाने, कारखान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मोदींच्या दाव्यांची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतले. नोकरदार व बेरोजगार युवकांनाही या पॅकेजबद्दल विचारले पण कोणत्याच घटकाला या पॅकेजमधून काहीही मिळालेले नाही, असे समोर आले. १० ऑगस्टपासून ४ दिवस शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, नोकरदारांशी केलेल्या संवादानंतर आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज युवक काँग्रेसने राज्यातील सर्व भाजपा कार्यालये व खासदारांच्या घरासमोर जाऊन त्यांनाच २० लाख करोड नक्की कुठे गेले, अशी विचारणा केली. या आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केले.
वाचा: फडणवीसांच्या संभाव्य प्रमोशनवर काँग्रेस नेत्याची टोलेबाजी