कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील विशेष मोहिमेच्या रविवारी अंतिम दिवसअखेर ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज दाखल झाले. महसूल प्रशासनाकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. यामुळे अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठीशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. मोहिमेचा रविवारी शेवटचा दिवस होता. तालुकानिहाय अर्जांची संख्या अशी : आजरा १५१८, गगनबावडा ७७४, भुदरगड १६०३, चंदगड २७३१, गडहिंग्लज ३४९६, हातकणंगले ६७००, कागल २०३४, करवीर ५३७९, पन्हाळा ४२५१, राधानगरी २१९३, शाहूवाडी ३५९४, शिरोळ २८३९.
‘किसान सन्मान’साठी३७ हजार नव्याने अर्ज
केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील विशेष मोहिमेच्या रविवारी अंतिम दिवसअखेर ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज दाखल झाले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2019, 4:00 am