अ‍ॅपशहर

सांगलीतील हत्येचा ३ महिन्यांनंतर उलगडा; पुण्यातून ४ जणांना अटक

शेतात रुतलेला टेम्पो काढण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2021, 9:19 pm

हायलाइट्स:

  • तब्बल ३ महिन्यानंतर झाला हत्या प्रकरणाचा उलगडा
  • पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून केली आरोपींना अटक
  • चार जणांना ठोकल्या बेड्या; एक फरार
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sangali murder
सांगली हत्या प्रकरण
सांगली : पुणे जिल्ह्यातील पाच जणांनी जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील नामदेव शिवाजी ताटे (रा. शेगाव ता. जत) याचा निर्घृण खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. शेतात रुतलेला टेम्पो काढण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या खुनाचा तपास करून चौघांना अटक केली, तर एका संशयिताचा अजून शोध सुरू आहे.
सर्व आरोपी मुळशी तालुक्यातील आहेत. सुरेश कारभारी हिरगोड (वय ३०), अनिल सुरेश काळेल (वय २९), रामेश्वर नीळकंठराव जोगदंड (वय ४५), तानाजी रावसाहेब जाधव (वय ४५ सर्व रा. उरवडी, ता. मुळाशी, जि. पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा आणखी एक साथीदार विजय कराळे हा पसार झाला आहे. खुनाची घटना २६ एप्रिल २०२१ रोजी निगडी खुर्द येथे घडली होती.

coronavirus in maharashtra: राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; मात्र, मृत्यूंचा आकडा चिंतेत भर घालणारा!

सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास जत तालुक्यातील निगडी खुर्द ते बनाळी रोडलगत नामदेव ताटे यांचा शेतातील घरात एक मृतदेह आढळला होता. धारदार हत्याराने मृताच्या छातीवर, पाठीवर, पोटावर, मनगटावर, पंज्यावर, बोटावर, दंडावर, गुडघ्यावर सपासप वार केले होते.

या घटनेची जत पोलिसात नोंद झाली होती. ताटे हा एकटाच राहत असल्याने या गुन्ह्याचा तपास करणे कठीण झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक निगडी येथे पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, निगडी खुर्द येथील तानाजी जाधव यांच्याकडे विजय कराळे हा आयशर टेम्पो घेऊन कामानिमित्त आला होता. त्यावेळी तानाजी जाधव यांच्या शेतात विजय कराळे याचा टेम्पो अडकला होता. त्यावेळी तानाजी जाधव, विजय कराळे यांनी नामदेव ताटे यांच्या मालकीच्या शेतातून माती काढून टेम्पोखाली टाकली.

माती काढण्यावरून नामदेव ताटे व तानाजी जाधव या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. या अनुषंगाने सपोनि रविराज फडणीस यांनी तपास केला असता, संशयित म्हणून तानाजी जाधव यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यानंतर जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली.

जाधव याच्या सांगण्यानुसार, काही दिवसांपूर्वी विजय कराळे हा याचा आयशर टेम्पो घेऊन माझ्याकडे आला होता. त्यावेळी माझा नामदेव ताटे याच्यासोबत झाला होता. याचा राग मनात धरुन मी चार साथीदारांसह नामदेव ताटे याचा खून केला. सपोनि रविराज फडणीस यांनी उरवडी (ता. मुळशी) येथे जाऊन गुन्ह्यातील तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या तिघांनीही गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. खुनाच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज