अ‍ॅपशहर

१५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले

शिवाजी विद्यापीठाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे १२७ अतिरिक्त तुकड्यांचे पाठवले आहेत. या प्रस्तावाला ३१ जुलैनंतर मान्यता मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांचे प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे सत्र लांबणार आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 1:40 am
Maruti.Patil@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम admission problem
१५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे १२७ अतिरिक्त तुकड्यांचे पाठवले आहेत. या प्रस्तावाला ३१ जुलैनंतर मान्यता मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांचे प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे सत्र लांबणार आहे. अतिरिक्त तुकड्यांच्या प्रस्तावाला अद्याप मान्यता न मिळाल्याने या विद्यार्थ्यांबरोबरच कॉलेज प्रशासनही हवादिल झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. व्यवसाय कौशल्य आणि संगणक अभ्यासक्रमांबरोबर कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांतून पदवीप्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे दरवर्षी अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे ऑक्टोबरमध्येच प्रस्ताव पाठवले जातात. त्यांची छाननी केल्यानंतर विद्यापीठाच्यावतीने मार्चमध्ये राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अतिरिक्त तुकड्यांचे प्रस्ताव पाठवले जातात. त्यानंतर साधारण जून किंवा जूनअखेर प्रस्तावांना मान्यता मिळते. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी मात्र राज्य सरकारकडून अतिरिक्त तुकड्यांचे प्रस्ताव मान्य करण्याची कार्यवाही न झाल्याने महाविद्यालयांसमोर प्रथम वर्ष अभ्यासक्रमांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साताऱ्यातून ५५, कोल्हापूर ५४ तर सांगली जिल्ह्यातून तुकडीवाढीचे २२ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.जुन्या प्रवेश क्षमतेनुसार प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे.

क्षमता कमी, अर्ज जास्त

राजाराम कॉलेजमधील बी. एस्सी प्रथम वर्षासाठी अनुदानीत १२० व २४० विनाअनुदानीत अशी ३६० प्रवेश क्षमता आहे. मात्र प्रवेशासाठी २२०१ अर्ज आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांचे काय करायचे, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर आहे. अशीच काहीशी स्थिती न्यू कॉलेज व महावीर कॉलेजमध्ये निर्माण झाली आहे.

पुढील शैक्षणिक वर्षाच्या वाढीव तुकड्यासाठी ऑक्टोबरमध्ये विद्यापीठांना प्रस्ताव पाठवावे लागतात. त्यानंतर विद्यापीठातर्फे उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता मिळते. यावर्षीच्या वाढीव तुकड्यांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रथम वर्ष अभ्यासक्रमांचे विद्यार्थ्यांचे प्रवेश लांबण्याची शक्यता आहे.

- डॉ. आर. पी. लोखंडे, प्राचार्य, महावीर कॉलेज

जूनपर्यंत अतिरिक्त तुकड्यांना मान्यता मिळेल अशी शक्यता होती. मात्र अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. प्रस्तावांना त्वरित मान्यता न मिळाल्यास विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील.

- प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, बीसीयूडी, शिवाजी विद्यापीठ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज