कोल्हापूर
‘दौलत साखर कारखान्यातील (न्युट्रियन्स) साखर पोती चोरीप्रकरणाने सहकाराला काळिमा लागला आहे. दौलत कारखाना गोकाक येथील न्युट्रियन्स कंपनीने भाडेतत्वावर चालवण्यास घेतला आहे. कंपनीकडे अद्यापही बँकेचे येणे कर्ज आहे. कारखान्यात शिल्लक असलेली साखरेवर तारण कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे बँकेच्या परवानगीशिवाय साखरेची विक्री करता येत नाही. कंपनीचा सर्व कारभार जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन विनायक ऊर्फ अप्पी पाटील पाहत आहेत. मात्र परवानगीशिवाय साखरेच्या पोत्यांची उचल केली असल्याचे स्पष्ट झाले असून नैतिकदृष्ट्या व्हाईस चेअरमन पाटील यांनी राजीनामा द्यावा. पाटील हे काँग्रेस पक्षातून निवडून आले असल्याने काँग्रेस नेत्यांनीच याबाबतचा निर्णय घ्यावा,’ असे बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, ‘दौलत कारखाना कंपनीने भाडेतत्वावर घेतल्यानंतर गतवर्षी पहिलाच गळीत हंगाम पार पडला. हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी ६० हजार २९९ पोती शिल्लक होती. त्यापैकी गेल्या काही दिवसांत कारखन्यातून चार कोटी तीन लाख किमंतीची ११ हजार ५१५ साखर पोती शुक्रवारी (ता. ११) चोरीस गेली. उत्पादीत साखरेवर बँकेचे तारण कर्ज असल्याने संचालकांनी तीतडीने चर्चा करुन बँकेचे एक पथक तातडीने कारखानास्थळी पाठवले. सहकारातील अत्यंत वेदनादायी प्रकार असताना व्हाइस चेअरमन संबंधित घटना घडल्याच्या दिवशी दिवसभर बँकेत बसून होते. चोरी झालेल्या साखर पोत्यांची रक्कम बँक खात्यावर जमा करण्याची तयारीही दर्शवत कारवाई न करण्याची मागणी केली होती. पण सर्व संचालक मंडळांशी चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्याचे निश्चित केले.’
‘शुक्रवारी पोलिसांच्या मदतीने साखरेच्या गोडावनची तपासणी केली. यामध्ये ११ हजार ५१५ पोत्यांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरीत चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस साखर पोत्यांचा शोध घेत आहेत. उत्पादीत झालेल्या साखरेवर बँकेचे कर्ज असल्याने चोरी झालेल्या साखर पोत्यांची रक्कम जमा करण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापन व कार्यकारी संचालकांना दिल्या असून याबाबत कार्यकारी संचालक शिर्के यांनी बँकेशी संपर्क साधून रक्कम भरण्याची ग्वाही दिली आहे.’
‘दौलत साखर कारखान्यातील (न्युट्रियन्स) साखर पोती चोरीप्रकरणाने सहकाराला काळिमा लागला आहे. दौलत कारखाना गोकाक येथील न्युट्रियन्स कंपनीने भाडेतत्वावर चालवण्यास घेतला आहे. कंपनीकडे अद्यापही बँकेचे येणे कर्ज आहे. कारखान्यात शिल्लक असलेली साखरेवर तारण कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे बँकेच्या परवानगीशिवाय साखरेची विक्री करता येत नाही. कंपनीचा सर्व कारभार जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन विनायक ऊर्फ अप्पी पाटील पाहत आहेत. मात्र परवानगीशिवाय साखरेच्या पोत्यांची उचल केली असल्याचे स्पष्ट झाले असून नैतिकदृष्ट्या व्हाईस चेअरमन पाटील यांनी राजीनामा द्यावा. पाटील हे काँग्रेस पक्षातून निवडून आले असल्याने काँग्रेस नेत्यांनीच याबाबतचा निर्णय घ्यावा,’ असे बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, ‘दौलत कारखाना कंपनीने भाडेतत्वावर घेतल्यानंतर गतवर्षी पहिलाच गळीत हंगाम पार पडला. हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी ६० हजार २९९ पोती शिल्लक होती. त्यापैकी गेल्या काही दिवसांत कारखन्यातून चार कोटी तीन लाख किमंतीची ११ हजार ५१५ साखर पोती शुक्रवारी (ता. ११) चोरीस गेली. उत्पादीत साखरेवर बँकेचे तारण कर्ज असल्याने संचालकांनी तीतडीने चर्चा करुन बँकेचे एक पथक तातडीने कारखानास्थळी पाठवले. सहकारातील अत्यंत वेदनादायी प्रकार असताना व्हाइस चेअरमन संबंधित घटना घडल्याच्या दिवशी दिवसभर बँकेत बसून होते. चोरी झालेल्या साखर पोत्यांची रक्कम बँक खात्यावर जमा करण्याची तयारीही दर्शवत कारवाई न करण्याची मागणी केली होती. पण सर्व संचालक मंडळांशी चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्याचे निश्चित केले.’
‘शुक्रवारी पोलिसांच्या मदतीने साखरेच्या गोडावनची तपासणी केली. यामध्ये ११ हजार ५१५ पोत्यांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरीत चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस साखर पोत्यांचा शोध घेत आहेत. उत्पादीत झालेल्या साखरेवर बँकेचे कर्ज असल्याने चोरी झालेल्या साखर पोत्यांची रक्कम जमा करण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापन व कार्यकारी संचालकांना दिल्या असून याबाबत कार्यकारी संचालक शिर्के यांनी बँकेशी संपर्क साधून रक्कम भरण्याची ग्वाही दिली आहे.’