म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
रस्त्यालगत असलेल्या खणीमध्ये कार कोसळून बाप-लेकीला जीव गमवावा लागण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने रविवारी पाहणी केली व सुरक्षेचे उपाय म्हणून तातडीने क्रॅश बॅरिअर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी या रस्त्यालगतच्या धोकादायक खणींची पाहणी केल्यानंतर ही उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी चारच्या सुमारास आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राहुल जाधव हे त्यांच्या तीन वर्षीय शर्वरीला सोबत घेऊन कारमधून बालिंग्याकडे जात होते. क्रशर चौकात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर कार थेट खणीत कोसळली. अपघातानंतर महापालिका, अग्निशमन दल, व्हाईट आर्मीसह पोलिसांनी साडेचार तास अथक प्रयत्न करून कारचालक राहुल जाधव आणि शर्वरीचे मृतदेह बाहेर काढले. वडिलांसोबत कारमधून जाताना काळाने घाला घातलेल्या चिमुरडीला अवघ्या तीन वर्षांचे आयुष्य मिळाले. स्वतःचा कोणताही दोष नसताना तिच्या आयुष्याची दोरी तुटली. मदत पथकांनी शर्वरीचा मृतदेह खोल खणीतून बाहेर काढून उत्तरीय तापसणीसाठी सीपीआर रुग्णालयात हलवला. यावेळी तिचा निपचित पडलेला मृतदेह पाहून उपस्थितांनाही हुंदका आवरता आला नाही. तिला खणीतून बाहेर काढणारे कार्यकर्तेही हेलावले होते. हा क्षण अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.
रस्त्यावर वर्दळ नसतानाही अपघात कसा झाला? कारमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला होता काय? महापालिकेने धोकादायक खणींभोवती सुरक्षा भिंत का उभारली नाही? अशा अनेक प्रश्नांची उलटसुलट चर्चा रविवारी दिवसभर सुरू होती. काही नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जुना राजवाडा पोलिसांनीही अपघातातील कारची पाहणी केली असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आकस्मित अपघात आणि निधन अशीच नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. महापालिकेतील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रविवारी सकाळी रंकाळा परिसरातील पाचही खणींची पाहणी केली. यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेत धोकादायक खणींच्या भोवती क्रॅश बॅरिअर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तातडीने हे काम केले जाणार आहे.
तारेचे कुंपण गायब
जिथे अपघात झाला त्या ठिकाणी तारेचे कुंपण होते, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी कोणताच अडसर नव्हता. क्रशर चौक ते शालिनी पॅलेस या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. रस्त्यापासून काही फुटांवरच खणी आहेत, त्यामुळे रस्ता रुंदीकरण करतानाच हा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. अपघातानंतर महापालिकेने आता तातडीने क्रॅश बॅरिअर उभे करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्यालगत असलेल्या खणीमध्ये कार कोसळून बाप-लेकीला जीव गमवावा लागण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने रविवारी पाहणी केली व सुरक्षेचे उपाय म्हणून तातडीने क्रॅश बॅरिअर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी या रस्त्यालगतच्या धोकादायक खणींची पाहणी केल्यानंतर ही उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी चारच्या सुमारास आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राहुल जाधव हे त्यांच्या तीन वर्षीय शर्वरीला सोबत घेऊन कारमधून बालिंग्याकडे जात होते. क्रशर चौकात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर कार थेट खणीत कोसळली. अपघातानंतर महापालिका, अग्निशमन दल, व्हाईट आर्मीसह पोलिसांनी साडेचार तास अथक प्रयत्न करून कारचालक राहुल जाधव आणि शर्वरीचे मृतदेह बाहेर काढले. वडिलांसोबत कारमधून जाताना काळाने घाला घातलेल्या चिमुरडीला अवघ्या तीन वर्षांचे आयुष्य मिळाले. स्वतःचा कोणताही दोष नसताना तिच्या आयुष्याची दोरी तुटली. मदत पथकांनी शर्वरीचा मृतदेह खोल खणीतून बाहेर काढून उत्तरीय तापसणीसाठी सीपीआर रुग्णालयात हलवला. यावेळी तिचा निपचित पडलेला मृतदेह पाहून उपस्थितांनाही हुंदका आवरता आला नाही. तिला खणीतून बाहेर काढणारे कार्यकर्तेही हेलावले होते. हा क्षण अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.
रस्त्यावर वर्दळ नसतानाही अपघात कसा झाला? कारमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला होता काय? महापालिकेने धोकादायक खणींभोवती सुरक्षा भिंत का उभारली नाही? अशा अनेक प्रश्नांची उलटसुलट चर्चा रविवारी दिवसभर सुरू होती. काही नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जुना राजवाडा पोलिसांनीही अपघातातील कारची पाहणी केली असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आकस्मित अपघात आणि निधन अशीच नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. महापालिकेतील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रविवारी सकाळी रंकाळा परिसरातील पाचही खणींची पाहणी केली. यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेत धोकादायक खणींच्या भोवती क्रॅश बॅरिअर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तातडीने हे काम केले जाणार आहे.
तारेचे कुंपण गायब
जिथे अपघात झाला त्या ठिकाणी तारेचे कुंपण होते, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी कोणताच अडसर नव्हता. क्रशर चौक ते शालिनी पॅलेस या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. रस्त्यापासून काही फुटांवरच खणी आहेत, त्यामुळे रस्ता रुंदीकरण करतानाच हा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. अपघातानंतर महापालिकेने आता तातडीने क्रॅश बॅरिअर उभे करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.