म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गुजरातच्या निवडणुकीनंतर मंत्री बनणार आहे, असे सांगणारे नारायण राणे मंत्री होतील की संत्री हे माहिती नाही, असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी लगावला. बारा वर्षापूर्वीं शिवसेनेचा नारायण राणे यांच्याशी संबंध संपला आहे. तरीही ते सतत शिवसेनेवर, पक्षप्रमुखांवर बोलत असतात. हा उद्योग बंद करावा, अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला.
रविवारी कोल्हापुरात आलेल्या दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टिका केली. दुधवडकर म्हणाले, ‘राणे यांना माहिती आहे की शिवसेनेवर बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ते सतत टीका करत असतात. त्यांच्याकडे जी काही गुपिते आहेत ती त्यांनी एकदा उघड करावीच. पण वाघ आल्याचे सांगून घाबरवणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे. सततच्या टिकमुळे त्यांच्या पाठीशी आता जनाधार राहिलेला नाही. नवीन पक्ष काढला आहे, त्याच्या मेळाव्यांना सिंधुदुर्गातून सुरू करण्याऐवजी कोल्हापुरातून केली आहे, यातूनच सारे स्पष्ट होत आहे. इतरांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात करावी. कोल्हापुरात ज्या कोरे, जानकर यांनी पक्ष काढले, त्यांची काय अवस्था आहे हे राणे यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यांनी त्याचे नियम बनवावेत. आमच्यावर बोलण्याचा आता प्रयत्न करू नये.’
राणे मंत्री होणार असल्याचे वक्तव्य करत असल्याबाबत दुधवडकर म्हणाले, ‘शिवसेनेचा व राणे यांचा संबंध संपला आहे. त्यामुळे त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असेल तर ते मंत्रिपद देतील. त्याबाबतही शिवसेनेचा काहीच संबंध नाही. गुजरातच्या निवडणुकीनंतर मंत्री होणार असे राणे सांगत असेल तरी ते मंत्री होणार की संत्री हे आपल्याला माहिती नाही. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदारांना आव्हान दिल्यानंतर आमदार व जिल्हाप्रमुखांनी उत्तर दिले आहे. दसरा चौकात एक करमणुकीचा कार्यक्रम होता. शहरवासियांची चांगली करमणूक झाली. आमच्या पक्षातील पाहण्यासाठी पक्षप्रमुख सक्षम आहेत. राणेंनी त्यांच्या पक्षाचे पहावे. यानंतरही शिवसेनेवर ते बोलल्यास सध्या तरी लोकशाही पद्धतीने पाहू.’ यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार वैभव नाईक, शहर प्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, युवा सेनेचे हर्षल सुर्वे उपस्थित होते.
खासदार बाणाच्या चिन्हावरीलच
जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदारपद थोडक्यात चुकले. पण आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होणार असे संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी सांगितले. त्यावेळी प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीबाबत विचारल्यानंतर खासदारकीच्या उमेदवाराबाबत न बोलता खासदार शिवसेनेच्या बाणाच्या चिन्हावरीलच होणार असे सांगितले.
दोन मुलांच्या पुनर्वसनासाठी पक्ष
राणे हे भाजपचे बांडगुळ म्हणून वावरत असल्याचा जोरदार आरोप करत आमदार वैभव नाईक म्हणाले, राणे यांनी आपल्या दोन मुलांच्या पुनर्वसनासाठी पक्ष काढला आहे. त्यांची सिंधुदुर्गामध्येच ताकद संपलेली असताना इतर ठिकाणचा जनाधार कसा मिळणार? त्यांनी शिवसेनेवर टिका करुन स्वतःचा टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आम्हाला लॉलीपॉप दाखवू नये
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, राणे यांना राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटले असून त्यांच्या सिंधुदुर्गात ते संपले असताना कोल्हापुरात येऊन आम्हाला काय संपवणार? त्यांना सभेसाठी भाड्याने माणसे आणावी लागली. त्यांनी आम्हाला लॉलीपॉप दाखवू नये. आमच्यातील कुणीही त्याला भुलणार नाही.
गुजरातच्या निवडणुकीनंतर मंत्री बनणार आहे, असे सांगणारे नारायण राणे मंत्री होतील की संत्री हे माहिती नाही, असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी लगावला. बारा वर्षापूर्वीं शिवसेनेचा नारायण राणे यांच्याशी संबंध संपला आहे. तरीही ते सतत शिवसेनेवर, पक्षप्रमुखांवर बोलत असतात. हा उद्योग बंद करावा, अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला.
रविवारी कोल्हापुरात आलेल्या दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टिका केली. दुधवडकर म्हणाले, ‘राणे यांना माहिती आहे की शिवसेनेवर बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ते सतत टीका करत असतात. त्यांच्याकडे जी काही गुपिते आहेत ती त्यांनी एकदा उघड करावीच. पण वाघ आल्याचे सांगून घाबरवणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे. सततच्या टिकमुळे त्यांच्या पाठीशी आता जनाधार राहिलेला नाही. नवीन पक्ष काढला आहे, त्याच्या मेळाव्यांना सिंधुदुर्गातून सुरू करण्याऐवजी कोल्हापुरातून केली आहे, यातूनच सारे स्पष्ट होत आहे. इतरांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात करावी. कोल्हापुरात ज्या कोरे, जानकर यांनी पक्ष काढले, त्यांची काय अवस्था आहे हे राणे यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यांनी त्याचे नियम बनवावेत. आमच्यावर बोलण्याचा आता प्रयत्न करू नये.’
राणे मंत्री होणार असल्याचे वक्तव्य करत असल्याबाबत दुधवडकर म्हणाले, ‘शिवसेनेचा व राणे यांचा संबंध संपला आहे. त्यामुळे त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असेल तर ते मंत्रिपद देतील. त्याबाबतही शिवसेनेचा काहीच संबंध नाही. गुजरातच्या निवडणुकीनंतर मंत्री होणार असे राणे सांगत असेल तरी ते मंत्री होणार की संत्री हे आपल्याला माहिती नाही. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदारांना आव्हान दिल्यानंतर आमदार व जिल्हाप्रमुखांनी उत्तर दिले आहे. दसरा चौकात एक करमणुकीचा कार्यक्रम होता. शहरवासियांची चांगली करमणूक झाली. आमच्या पक्षातील पाहण्यासाठी पक्षप्रमुख सक्षम आहेत. राणेंनी त्यांच्या पक्षाचे पहावे. यानंतरही शिवसेनेवर ते बोलल्यास सध्या तरी लोकशाही पद्धतीने पाहू.’ यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार वैभव नाईक, शहर प्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, युवा सेनेचे हर्षल सुर्वे उपस्थित होते.
खासदार बाणाच्या चिन्हावरीलच
जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदारपद थोडक्यात चुकले. पण आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होणार असे संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी सांगितले. त्यावेळी प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीबाबत विचारल्यानंतर खासदारकीच्या उमेदवाराबाबत न बोलता खासदार शिवसेनेच्या बाणाच्या चिन्हावरीलच होणार असे सांगितले.
दोन मुलांच्या पुनर्वसनासाठी पक्ष
राणे हे भाजपचे बांडगुळ म्हणून वावरत असल्याचा जोरदार आरोप करत आमदार वैभव नाईक म्हणाले, राणे यांनी आपल्या दोन मुलांच्या पुनर्वसनासाठी पक्ष काढला आहे. त्यांची सिंधुदुर्गामध्येच ताकद संपलेली असताना इतर ठिकाणचा जनाधार कसा मिळणार? त्यांनी शिवसेनेवर टिका करुन स्वतःचा टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आम्हाला लॉलीपॉप दाखवू नये
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, राणे यांना राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटले असून त्यांच्या सिंधुदुर्गात ते संपले असताना कोल्हापुरात येऊन आम्हाला काय संपवणार? त्यांना सभेसाठी भाड्याने माणसे आणावी लागली. त्यांनी आम्हाला लॉलीपॉप दाखवू नये. आमच्यातील कुणीही त्याला भुलणार नाही.