म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे गायीच्या दुधाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन त्यांच्यामार्फत हे प्रश्न सोडवले पाहिजेत, अन्यथा या सरकारलाही धडा शिकवला पाहीजे, असा इशारा अरूण नरके यांनी आपल्या गुरुवारी जागृती मोर्चादरम्यान दिला. व्यासपीठावर भाजपचे आमदार आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह अनेकजण उपस्थित असताना नरके यांनी ही टीका केली.
नरके म्हणाले, ‘गायीच्या अतिरिक्त दुधाचे संकट जगभर आहे, दूध पावडरचे दर प्रती किलो ११६ रूपयांपर्यंत खाली आले. अशा परिस्थितीत एक व दोन गाय किंवा म्हशीवर संसाराचा गाडा चालवणाऱ्या देशातील ९५ टक्के उत्पादकांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी दोन रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला, नंतर तो मागे घेतला, पण या काळात गोकुळला २५ कोटींचा फटका बसला. दरासाठी आमदार पाटील यांनी मोर्चा काढला. त्यांनी उठसूठ पेपरबाजी करण्यापेक्षा त्यांनी चर्चेला कधीही यावे, पण त्यांचे यायचे धाडस नाही कारण संघाचा कारभार कसा चालतो हे त्यांना माहित आहे.
चांगल्या संघाला बाधा नको
राज्यातील आणि देशातही चांगला कारभार असलेल्या ‘गोकुळ’ चा वापर राजकारणासाठी करू नका, चांगल्या पद्धतीने चाललेल्या संघाच्या कारभाराला बाधा येईल, असे वर्तन आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी करू नये, असा सल्ला माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, राज्यातील इतर संघ गायीच्या दुधाला २१ रूपये देतात. गोकुळ मात्र त्यापेक्षा जादा म्हणजे २५ रूपये आहे. संघाकडे एकूण दुधाच्या ६० टक्के दूध गायीचे येते, त्याला मागणी नाही पण संघाने ते कधी नाकारले नाही, शिवाय दर कमी केलेला नाही. काँग्रेस आणि भाजप सरकारने कोट्यावधी रूपयांचे अनुदान सरकारने या संघाला दिले, अशा संघाची सुरू असलेली बदनामी बरोबर नाही असे सांगत महाडिक व पाटील या दोघांनाही त्यांनी राजकारण न करण्याचा सल्ला दिला.
सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे गायीच्या दुधाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन त्यांच्यामार्फत हे प्रश्न सोडवले पाहिजेत, अन्यथा या सरकारलाही धडा शिकवला पाहीजे, असा इशारा अरूण नरके यांनी आपल्या गुरुवारी जागृती मोर्चादरम्यान दिला. व्यासपीठावर भाजपचे आमदार आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह अनेकजण उपस्थित असताना नरके यांनी ही टीका केली.
नरके म्हणाले, ‘गायीच्या अतिरिक्त दुधाचे संकट जगभर आहे, दूध पावडरचे दर प्रती किलो ११६ रूपयांपर्यंत खाली आले. अशा परिस्थितीत एक व दोन गाय किंवा म्हशीवर संसाराचा गाडा चालवणाऱ्या देशातील ९५ टक्के उत्पादकांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी दोन रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला, नंतर तो मागे घेतला, पण या काळात गोकुळला २५ कोटींचा फटका बसला. दरासाठी आमदार पाटील यांनी मोर्चा काढला. त्यांनी उठसूठ पेपरबाजी करण्यापेक्षा त्यांनी चर्चेला कधीही यावे, पण त्यांचे यायचे धाडस नाही कारण संघाचा कारभार कसा चालतो हे त्यांना माहित आहे.
चांगल्या संघाला बाधा नको
राज्यातील आणि देशातही चांगला कारभार असलेल्या ‘गोकुळ’ चा वापर राजकारणासाठी करू नका, चांगल्या पद्धतीने चाललेल्या संघाच्या कारभाराला बाधा येईल, असे वर्तन आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी करू नये, असा सल्ला माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, राज्यातील इतर संघ गायीच्या दुधाला २१ रूपये देतात. गोकुळ मात्र त्यापेक्षा जादा म्हणजे २५ रूपये आहे. संघाकडे एकूण दुधाच्या ६० टक्के दूध गायीचे येते, त्याला मागणी नाही पण संघाने ते कधी नाकारले नाही, शिवाय दर कमी केलेला नाही. काँग्रेस आणि भाजप सरकारने कोट्यावधी रूपयांचे अनुदान सरकारने या संघाला दिले, अशा संघाची सुरू असलेली बदनामी बरोबर नाही असे सांगत महाडिक व पाटील या दोघांनाही त्यांनी राजकारण न करण्याचा सल्ला दिला.