कोल्हापूर: 'बदललेल्या जीवनशैलीमुळे व्यसनाधिनता, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणावामुळे मधुमेह, कॅन्सर, रक्तदाबासह अन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. योग्य दिनचर्या, योग व प्राणायमचा अवलंब केल्यास जीवन सुखकारक व आनंददायी होईल,'असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयतर्फे राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त 'स्वास्थस्य स्वास्थ रक्षणमं-आयुर्वेद जनस्वास्थ्यासाठी' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी मार्गदर्शन केले.
आयुर्वेद कार्यशाळा
'बदललेल्या जीवनशैलीमुळे व्यसनाधिनता, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणावामुळे मधुमेह, कॅन्सर, रक्तदाबासह अन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे...
Maharashtra Times 18 Nov 2018, 4:00 am