कोल्हापूर टाइम्स टीम
केंद्र सरकारच्या ईज (ईएएसई) नुसार बँकिंगमधील सुधारणांच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखाच्या वर्गीकरणानुसार शुक्रवारपासून बदलेल्या वेळेनुसार कामकाज सुरू झाले. रहिवाशी क्षेत्रात सकाळी नऊ ते दुपारी चार, व्यापारी क्षेत्रात सकाळी ११ ते सायंकाळी सहा तर व्यापरी आणि रहिवाशी क्षेत्रात सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत बँका सुरू राहतील.
इंडियन बँक असोसिएशनने ग्राहकांसाठी देशातील राष्ट्रीयीकृत बँक शाखाच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार आजपासून बँकांनी कामकाज सुरू केले.
रहिवासी क्षेत्रातील बँकांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असल्याने उपनगरातील बहुतांशी बँकाचे कामकाज बदलेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाले. रुईकर कॉलनी, जरगनगर, सानेगुरुजी वसाहत येथील बँकांच्या शाखेत ग्राहकांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सेवा देण्यात आली.
व्यापारी क्षेत्रात बँकांची वेळ सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या परिसरातील बँकांनी या वेळेनुसार कामकाज सुरू केले. पण ज्या ठिकाणी रहिवासी आणि व्यापारी क्षेत्र आहे या ठिकाणातील बँकांची वेळ सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ठेवली आहे. गंगावेश, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा या परिसरातील बँकांनी १० ते ५ या वेळेत बँकेचे कामकाज सुरू होत्या.
बदलेल्या वेळांची माहिती बँकांनी एसएमएसद्वारे ग्राहकांना कळवली आहे. तसेच दर्शनी भागातही बदलेल्या वेळांचे फलक लावण्यात आले आहेत.
बदललेल्या वेळा
रहिवाशी क्षेत्र
सकाळी नऊ ते दुपारी चार
व्यापारी क्षेत्र
सकाळी ११ ते सायंकाळी सहा
व्यापारी व रहिवाशी क्षेत्र
सकाळी १० ते सायंकाळी पाच