फोटो आहे
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
वाहनांच्या बॅटऱ्या लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांकडून सव्वा लाख रुपयांचा १७ बॅटरी राजारामपुरी पोलिसांनी जप्त केल्या. मोहसीन नासीर चित्तेवान (वय २६, रा. महातगल्ली, कोल्हापूर), अक्षय विजय कांबळे (वय २५ रा. लक्ष्मीपुरी, भाजी मार्केट) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्याची नावे आहेत. त्यांनी राजारामपुरी परिसरात घरासमोर, मोकळ्या मैदानात लावलेल्या अवजड वाहनांच्या बॅटरी चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली. आयसोलेशन हॉस्पिटल, वाळू अड्डा, मार्केट यार्ड, रेल्वे गुड्स यार्ड या ठिकाणी उभ्या अवजड वाहनांतूनही बॅटरी चोऱ्या केल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख २३ हजाराच्या १७ बॅटरी जप्त केल्या. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औंदूबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. शहरात बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर विशेष पथके नेमून तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.