अ‍ॅपशहर

सावधान! गोव्यातून दारुची एकही बाटली आणली तर... आता तस्करांवर 'मोक्का' लागणार

गोव्यातून महाराष्ट्रात अवैध दारू अणणाऱ्यांवर किंवा तस्करी करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार आहे. थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 12:12 pm
कोल्हापूर : गोव्यातून लपूनछपून दारुच्या बाटल्या आणत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण आता गोव्यातून एक जरी दारुची बाटली आणली तरी संबंधितांवर महाराष्ट्रात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. दारू तस्करी करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो पोलीस प्रशासनाला पाठवण्याच्या सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई ही अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर केली जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mcoca to be invoked against liqour smugglers
सावधान! गोव्यातून दारुची एकही बाटली आणली तर... आता तस्करांवर 'मोक्का' लागणार


उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी कोल्हापुरात विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कर्नाटक आणि गोव्यातून मद्याची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी कडक तपासणी सुरू करण्याची सूचना मंत्री देसाई यांनी दिल्या. मार्गांवर तात्पुरते चेक नाके उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवल्यास मंजुरी देण्यातील असेही मंत्री देसाई म्हणाले.

गोव्यातून महाराष्ट्रात अवैधपणे दारू तस्करी केली जाते. हे प्रमाण वाढत असल्याने अशा प्रकारांवर कारवाई होत आहे. मोठ्या प्रमाणात दारुचा अवैध साठा जप्त केला जात आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या मार्गांवर चेक नाहीत तिथे आम्ही चेक नाके उभारणार आहोत. जे सतत दारूची तस्करी करत आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (maharashtra prevention of dangerous activities act ) कलम ९३ नुसार सध्या कारवाई केली जात आहे. आणि यापुढे मोक्काअंतर्गत कारवाई होणार असल्यास दारू तस्करीचे प्रमाण कमी होईल, कोल्हापूर उत्पादन शुक्ल विभागाचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी दिली.

Kolhapur : तीन मुले असलेल्या विधवेवर प्रेम जडले, लग्नाला नकार दिल्याने तो संतापला आणि...

मद्यविक्री करणाऱ्या गोव्यातील दुकानदारांकडून ग्राहकांना रस्तेमार्गे दारू वाहतुकीचा परवाना दिला जातो. हा परवाना काही राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये वैध असल्याचा दावा गोव्यातील दारू विक्रेत्या दुकानदारांकडून केला जातो. मात्र या परवान्याला कुठलीही वैधता नाहीए. या परावन्याची किंमत शून्य आहे. कायद्यानुसार गोव्यातून महाराष्ट्रात एकही दारुची बाटली आणता येत नाही. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी गोव्यातील दुकानदारांकडून अशा प्रकारचा हा परवाना निरर्थक आहे. कुणीही आपल्या खासगी वाहनाने किंवा कारने एकही दारुची बाटली आणू शकत नाही. त्या व्यक्तीला मोठा भूर्दंड बसू शकतो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कोल्हापूर हादरले; कागलमध्ये रागाच्या भरात त्याने पत्नीसह दोन मुलांनाही संपवले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज