बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांची अंमलबजावणी सध्याचे भाजप सरकार करत असल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचे खासगीकरण, रोजगारनिर्मितीकडे दुर्लक्ष झाले आहे. पुरोगामी राज्याला दिशा देण्याची क्षमता बहुजन समाज पक्षामध्ये असल्याने या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. आरएसएस व भाजपने कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणली असून, दंगलीत तेल ओतण्याचे काम भारतीय बहुजन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले, असा आरोपही बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी पत्रकार बैठकीत केला.
साखरे म्हणाले, 'भाजप सरकारने शिक्षणाचे व्यापारीकरण चालवले असल्याने सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. दरवर्षी लाखो रोजगार निर्माण करण्याची घोषणा हवेत विरली असून, अनेक युवकांना सरकारच्या चुकीच्या धारोणांमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची केवळ घोषणाच केली जात आहे. ७० वर्षांत ज्या समस्या होत्या, त्या तशाच आहेत. बसपला सत्ता दिल्यास देशाचे चित्र बदलण्याची ताकद पक्षामध्ये आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एव्हीएम मशिनचा वापर नको, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतपत्रिकेसाठी सरकारने निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे एव्हीएम मशिनच्या मदतीने निवडणुका जिंकण्याचे कारस्थान भाजप करत आहे.
ना. तु. खंदारे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दलित वस्ती सुधारणा योजनांचा निधी वापरला आहे. शेतकऱ्यांबरोबरच बलुतेदार व आलुतेदारांनी त्यांचेही कर्जमाफ करा. लातूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी व्हावी.' पत्रकार बैठकीस अॅड. संजीव सदाफुले, अजित कुरणे आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू, फुलेंना भारतरत्न द्या
तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना बसपने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठिंबा दिला होता. या दोन्हीची अंमलबजावणी झाली. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी यापुढे करण्यात येणार असल्याचे साखरे यांनी सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांची अंमलबजावणी सध्याचे भाजप सरकार करत असल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचे खासगीकरण, रोजगारनिर्मितीकडे दुर्लक्ष झाले आहे. पुरोगामी राज्याला दिशा देण्याची क्षमता बहुजन समाज पक्षामध्ये असल्याने या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. आरएसएस व भाजपने कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणली असून, दंगलीत तेल ओतण्याचे काम भारतीय बहुजन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले, असा आरोपही बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी पत्रकार बैठकीत केला.
साखरे म्हणाले, 'भाजप सरकारने शिक्षणाचे व्यापारीकरण चालवले असल्याने सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. दरवर्षी लाखो रोजगार निर्माण करण्याची घोषणा हवेत विरली असून, अनेक युवकांना सरकारच्या चुकीच्या धारोणांमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची केवळ घोषणाच केली जात आहे. ७० वर्षांत ज्या समस्या होत्या, त्या तशाच आहेत. बसपला सत्ता दिल्यास देशाचे चित्र बदलण्याची ताकद पक्षामध्ये आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एव्हीएम मशिनचा वापर नको, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतपत्रिकेसाठी सरकारने निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे एव्हीएम मशिनच्या मदतीने निवडणुका जिंकण्याचे कारस्थान भाजप करत आहे.
ना. तु. खंदारे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दलित वस्ती सुधारणा योजनांचा निधी वापरला आहे. शेतकऱ्यांबरोबरच बलुतेदार व आलुतेदारांनी त्यांचेही कर्जमाफ करा. लातूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी व्हावी.' पत्रकार बैठकीस अॅड. संजीव सदाफुले, अजित कुरणे आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू, फुलेंना भारतरत्न द्या
तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना बसपने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठिंबा दिला होता. या दोन्हीची अंमलबजावणी झाली. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी यापुढे करण्यात येणार असल्याचे साखरे यांनी सांगितले.