कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरी वस्तीत पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. शिवाय ग्रामीण भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. जिल्ह्यातील ७२ मार्ग बंद आहेत. तसेच २०० गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले.
पूरग्रस्तांना भरपाई द्या
जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे नागरी वस्तीत पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे...
Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am