कोल्हापूर: ज्यांना आयुष्यात कधीच संधी मिळाली नाही, ते लोक आता सकाळ-दुपार-संध्याकाळ संधी घेत आहेत, अशी बोचरी टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे पवारांचं हे आव्हान चंद्रकांत पाटील स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'पाटील पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी,' असा टोला पवारांनी लगावला. मुंबई येथील भाजप मेळाव्यात बोलताना पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याशेजारी आणखी दोन-तीन कोठड्या शिल्लक आहेत, असा इशारा दिला होता. त्याला पवार यांनी प्रतिउत्तर दिले. ‘राज्यात भाजपची सत्ता आहे, मग ते कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट बघत आहेत. त्यांनी जरूर कोठड्या भराव्यात आमची काही हरकत नाही. उलट माणूस एकदा तुरुगांत जाऊन आला की पुढची निवडणूक त्याला सोपी जाते.
महसूलमंत्री पाटील यांच्यावर भाष्य न केलेले बरे,' असा टोमणाही पवार यांनी हाणला. अर्थव्यवस्था अडचणीत आहे. शेतकऱ्यांपासून सगळेच अडचणीत आले आहेत. धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात, मात्र आता ते निर्णय कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
गुजरात पाकिस्तानात आहे काय?
नाणार प्रकल्पावरून सध्या सुरू असलेले राजकारण योग्य नसल्याचेही पवार म्हणाले. 'हा प्रकल्प कोकणात झाला नाही तर गुजरातला जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. हा प्रकल्प गुजरातला गेला किंवा अन्य राज्यात तरी तो देशातच असेल, गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही,' असा टोलाही पवार यांनी लगावला. या संदर्भात स्थानिकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी येत्या १० मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचे सांगतानाच या ठिकाणी सभा घेणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीची तयारी सुरू
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा मेळावा १० जून रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. त्यावेळी पक्षाची नीती ठरवली जाणार असल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होणार नाही यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी निवडणूक लढवावी. त्यांना इतर पक्षांनी सहकार्य करावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल पाहिले तर लोकांना विरोधक एकत्र हवे आहेत. पण विरोधक एकत्र राहतील की नाही याबाबत लोकांमध्ये अविश्वास राहू नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा आठ ठिकाणी पराभव
आमच्यामुळे भाजपचा फायदा होणार नाही, यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्रच असतात. संसदीय लोकशाहीच्याविरोधात काम करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. दीड महिन्यात १० निवडणुकीत ८ ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे, याकडेही त्यांनी माध्यमांचं लक्ष वेधलं.
देशहिताची चर्चा
माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीत राहुल गांधींसोबत देशहिताचीच चर्चा झाली, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. महिनाभरापूर्वी राहुल यांनी पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'पाटील पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी,' असा टोला पवारांनी लगावला. मुंबई येथील भाजप मेळाव्यात बोलताना पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याशेजारी आणखी दोन-तीन कोठड्या शिल्लक आहेत, असा इशारा दिला होता. त्याला पवार यांनी प्रतिउत्तर दिले. ‘राज्यात भाजपची सत्ता आहे, मग ते कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट बघत आहेत. त्यांनी जरूर कोठड्या भराव्यात आमची काही हरकत नाही. उलट माणूस एकदा तुरुगांत जाऊन आला की पुढची निवडणूक त्याला सोपी जाते.
महसूलमंत्री पाटील यांच्यावर भाष्य न केलेले बरे,' असा टोमणाही पवार यांनी हाणला. अर्थव्यवस्था अडचणीत आहे. शेतकऱ्यांपासून सगळेच अडचणीत आले आहेत. धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात, मात्र आता ते निर्णय कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
गुजरात पाकिस्तानात आहे काय?
नाणार प्रकल्पावरून सध्या सुरू असलेले राजकारण योग्य नसल्याचेही पवार म्हणाले. 'हा प्रकल्प कोकणात झाला नाही तर गुजरातला जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. हा प्रकल्प गुजरातला गेला किंवा अन्य राज्यात तरी तो देशातच असेल, गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही,' असा टोलाही पवार यांनी लगावला. या संदर्भात स्थानिकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी येत्या १० मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचे सांगतानाच या ठिकाणी सभा घेणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीची तयारी सुरू
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा मेळावा १० जून रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. त्यावेळी पक्षाची नीती ठरवली जाणार असल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होणार नाही यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी निवडणूक लढवावी. त्यांना इतर पक्षांनी सहकार्य करावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल पाहिले तर लोकांना विरोधक एकत्र हवे आहेत. पण विरोधक एकत्र राहतील की नाही याबाबत लोकांमध्ये अविश्वास राहू नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा आठ ठिकाणी पराभव
आमच्यामुळे भाजपचा फायदा होणार नाही, यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्रच असतात. संसदीय लोकशाहीच्याविरोधात काम करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. दीड महिन्यात १० निवडणुकीत ८ ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे, याकडेही त्यांनी माध्यमांचं लक्ष वेधलं.
देशहिताची चर्चा
माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीत राहुल गांधींसोबत देशहिताचीच चर्चा झाली, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. महिनाभरापूर्वी राहुल यांनी पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.