कोल्हापूर: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाट परिसर, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, कात्यायणी परिसरात दीपोत्सव साजरा झाला. दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
पंचगंगा घाटावर मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सवास सुरुवात झाली. नदीवरील घाट, मंदिरे, दीपमाळ्यावर दिवे प्रज्वलित करण्यात आले. दीपोत्सव पाहण्यासाठी नदी परिसरात नागरिकांनी फुलून गेला होता. रात्री राजाराम बंधारा येथेही दीपोत्सव साजरा झाला. बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या सभोवती उभारण्यात आलेल्या स्टँडवर भाविकांनी पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. शहरातील अनेक मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला.