म. टा. वृतसेवा, हातकणंगले
‘जिल्हा परिषदेच्या शिरोली व रेंदाळ मतदारसंघातील विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांत मतदानाच्या आकडेवारीतील फरक पाहता मतदानयंत्रात घोळ झाला असण्याची शक्यता आहे. या सर्व मतदानयंत्राची तपासणी करुन फेरमतदान घ्यावे,’ अशी मागणी सुचित्रा खवरे, तानाजी घोडेस्वार यांच्यासह चार पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सुचित्रा शशिकांत खवरे, शिरोली तालुका पंचायत समितीसाठी माधुरी पाटील, नागाव पंचायत समितीसाठी अजित घाटगे तसेच रेंदाळ जिल्हा परिषदेसाठी तानाजी घोडेस्वार या सर्वांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून हात चिन्हावर निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधात शिरोली जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या शौमिका महाडिक, रेंदाळमधून राहुल आवाडे यांनी निवडणूक लढविली.
मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मतदानाची आकडेवारी पाहता भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करुन मतदानयंत्रात फेरफार केला असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रेंदाळमध्ये राहुल आवाडे यांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मिळवलेली तब्बल अकरा हजार मते संशयास्पद आहेत.
या दोन्ही मतदारसंघातील मतदानयंत्रांची पुन्हा तपासणी करुन सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच याठिकाणी फेरमतदान घ्यावे. विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरक पाहता मतदान यंत्रात घोळ झाला असण्याची शक्यता आहे.
‘जिल्हा परिषदेच्या शिरोली व रेंदाळ मतदारसंघातील विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांत मतदानाच्या आकडेवारीतील फरक पाहता मतदानयंत्रात घोळ झाला असण्याची शक्यता आहे. या सर्व मतदानयंत्राची तपासणी करुन फेरमतदान घ्यावे,’ अशी मागणी सुचित्रा खवरे, तानाजी घोडेस्वार यांच्यासह चार पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सुचित्रा शशिकांत खवरे, शिरोली तालुका पंचायत समितीसाठी माधुरी पाटील, नागाव पंचायत समितीसाठी अजित घाटगे तसेच रेंदाळ जिल्हा परिषदेसाठी तानाजी घोडेस्वार या सर्वांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून हात चिन्हावर निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधात शिरोली जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या शौमिका महाडिक, रेंदाळमधून राहुल आवाडे यांनी निवडणूक लढविली.
मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मतदानाची आकडेवारी पाहता भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करुन मतदानयंत्रात फेरफार केला असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रेंदाळमध्ये राहुल आवाडे यांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मिळवलेली तब्बल अकरा हजार मते संशयास्पद आहेत.
या दोन्ही मतदारसंघातील मतदानयंत्रांची पुन्हा तपासणी करुन सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच याठिकाणी फेरमतदान घ्यावे. विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरक पाहता मतदान यंत्रात घोळ झाला असण्याची शक्यता आहे.